हिंदू धर्मात सर्वच सणांना विशेष महत्व आहे. त्यातील महत्वाचा सण म्हणजे दसरा. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात दसऱ्याला आपट्याची पाने 'सोने' म्हणून एकमेकांना दिली जातात. त्यानंतर सरस्वती पूजन व शस्त्रपूजा देखील केली जाते. सणावाराच्या दिवसांमध्ये दारात रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यामुळे अंगणाची शोभा वाढते आणि दरवाजा उठून दिसतो. (फोटो सौजन्य: Pinterest)
दसऱ्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा 'या' सुंदर डिझाईनची रांगोळी
दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता. आणि देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध केला जातो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी रावण जाळला जातो. त्यामुळे तुम्ही अशी सुंदर रांगोळी काढू शकता.
दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन केले जाते. तसेच घरात पाटीवर खडूच्या साहाय्याने सरस्वती काढली जाते. रांगोळीमध्ये सुद्धा तुम्ही सरस्वती काढू शकता.
सणावाराच्या दिवसांमध्ये सगळीकडेच खूप जास्त घाई असते. घाईच्या वेळी नेमकी कशी रांगोळी काढावी बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही आपट्याचे पान काढून त्यात शुभ दसरा लिहू शकता.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही या सुंदर डिझाईनची देवीची रांगोळी काढू शकता. रांगोळी काढताना रंग म्हणून वेगवेगळ्या धान्यांचा सुद्धा वापर केला जातो.
कमीत कमी वेळात तुम्हाला रांगोळी काढ्याची असेल तर तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता. मोठ्या जागेत फुलांची रांगोळी अतिशय सुंदर दिसते.