रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कोमट पाण्यात मिक्स करा 'हे' मसाले
लवंगामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फिनोलिक घटक असतात. त्यामुळे रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात ४ लवंग भिजत घालून ठेवाव्यात. त्यानंतर सकाळी उठल्यावर हे पाणी प्यायल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहील.
आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळते. सकाळी उठल्यानंतर रोज अर्धा ग्लास आल्याचे पाणी प्यायल्यास मधुमेह नियंत्रणात राहील.
मेथीच्या दाण्यांमध्ये असलेल्या फायबरमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. ग्लुकोजचे शोषण कमी प्रमाणात झाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.
जेवनंती पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आढळून येतो.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाण्यात दालचिनीचे पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. दालचिनीमध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आढळून येतात, ज्यामुळे इंसुलिनची संवेदनशीलता वाढून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.