जगात खाद्यप्रेमींची कमी नाही. आपल्या आवडीचे पदार्थ लोक फार मजा घेऊन खातात. पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या आवडीचे हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अन्न संशोधकांचे म्हणणे आहे की वाईट आहारामुळे आपल्या न्यूरॉन्सचे नुकसान होऊ शकते आणि आपल्याला नैराश्य आणि स्मृतिभ्रंश सारखे धोकादायक आजार होऊ शकतात. आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो. अनेकांना हे ठाऊक नाही पण रोजच्या आहारातील काही पदार्थ आपल्या आरोग्यावर वाइट परिणाम करत असतात
हे 5 पदार्थ मेंदूसाठी कोणत्या विषाहून कमी नाहीत; यांचे अतिसेवन शरीरासाठी ठरेल घातक
रिफाइंड शुगर किंवा जास्त साखरेचे सेवन केल्याने मेंदूमध्ये सूज वाढवतो. यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे समजून घेण्याची क्षमता नष्ट होते
बर्गर, समोसे, फ्रेंच फ्राईज यांसारख्या फास्ट फूडमध्ये असलेल्या ट्रान्स फॅट्समुळे मेंदूच्या पेशींना नुकसान पोहचते. असे म्हटले जाते की या पदार्थांमुळे मूड स्विंग्स म्हणजेच चिडचिडेपणा आणि नैराश्य वाढण्याची शक्यता असते
रिफाइंड पिठापासून बनवलेले ब्रेड, पिझ्झा, पास्ता यासारख्या गोष्टींमुळे शरीरात साखरेची पातळी अचानक वाढते. हे खाल्ल्याने मेंदूत सूज येते आणि लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो
कोल्ड्रिंक्स किंवा पॅकेज्ड ज्यूसमध्ये फ्रुक्टोज कॉर्न सिरपचे प्रमाण जास्त असते, जे मेंदूतील डोपामाइन संतुलन बिघडवते. त्यामुळे ताण, थकवा आणि चिडचिड सारख्या समस्या जाणवू लागतात
सॉसेज, सलामी आणि प्रोसेस फूडमध्ये मिसळलेली रसायने मेंदूची क्रिया मंदावतात. याशिवाय, यामुळे मानसिक थकवा, आळस आणि विचलितपणा देखील होतो