Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025: ‘पाकिस्तानसोबत खेळायला नको होतं, आपन त्यांना…’ अबू आझमी यांचे मोठ वक्तव्य

भारताने पाकिस्तानला हरवून नवव्यांदा आशिया कप जिंकला आहे. सर्वत्र भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, काही नेत्यांनी यावर टीका केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 29, 2025 | 03:10 PM
अबू आझमी यांचे मोठ वक्तव्य (Photo Credit- X)

अबू आझमी यांचे मोठ वक्तव्य (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘पाकिस्तानसोबत खेळायला नको होतं, आपन त्यांना…’
  • अबू आझमी यांचे मोठ वक्तव्य
  • ‘आम्ही पाकिस्तानला पैसे कमवण्याची संधी दिली’

Abu Azmi on IND vs PAK Match: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या आशिया कप विजयाबद्दल मोठे विधान केले आहे. भारताने पाकिस्तानचा पराभव करून ९व्यांदा आशिया कप जिंकला असला, तरी अबू आझमी यांनी यावर टीका केली आहे.

‘पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला नको’

अबू आझमी म्हणाले, “भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, कारण पाकिस्तान आमच्याविरुद्ध दहशतवादाला प्रोत्साहन देतो. तरीही, आपल्या संघाने चांगली कामगिरी केली आणि जिंकला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.”

#WATCH | Mumbai: On India defeating Pakistan to lift the #AsiaCupFinal trophy, Samajwadi Party leader Abu Asim Azmi says, “… We already said that we should not play this match with Pakistan…But our team won, and congratulations to them…If victory is ours, then why do our… pic.twitter.com/GFEXZvN9Cv — ANI (@ANI) September 29, 2025


ते पुढे म्हणाले, “या आशिया कपमधून मिळालेला सर्व महसूल काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिला पाहिजे. जर विजय आमचाच होणार होता, तर त्यांच्यासोबत खेळण्याची गरजच काय होती? आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना पाकिस्तानशी कोणतेही मैत्रीपूर्ण संबंध नको आहेत.”

‘आम्ही पाकिस्तानला पैसे कमवण्याची संधी दिली’

आझमींनी पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणाऱ्या कथित मदतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही त्यांना पैसे कमवण्याची संधी दिली. जर हे पैसे दहशतवादावर खर्च केले गेले, तर ते योग्य नाही. पाकिस्तान आधीच दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, आणि म्हणूनच आपण त्यांच्याशी युद्ध करून त्यांना पूर्णपणे संपवले पाहिजे. आपण युद्धबंदी का लागू केली?”

IND vs PAK Asia Cup 2025 : पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे मोहसिन नक्वीला लागली मिर्ची, प्रतिक्रियेने निर्माण झाला नवा वाद

“तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? – संजय राऊत

यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीसह भारत-पाक सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होऊ नये अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून सुरुवातीपासून केली जात आहे. पहलगामवर हल्ला झाल्यामुळे आणि यामध्ये 26 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पाकिस्तानसोबत सामना होऊ नये अशी मागणी केली जात होती. मात्र भारत आणि पाकिस्तानचा कोणताही सामना रद्द झाला नाही. तसेच अंतिम सामना देखील दोन्ही संघामध्ये झाल्यामुळे जोरदार टीका विरोधकांनी केली. तसेच राज्यातील सर्व पीव्हीआर मधील भारत-पाक सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग शिवसेना ठाकरे गटाकडून रद्द करण्यात आले. यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत टीकास्त्र डागले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानबरोबर खेळायला विरोध आहे ही लोकभावना आहे. काल अनेक ठिकाणी मॅच दाखवण्याचा प्रयत्न झाला तो आम्ही हाणून पडला. काल भारतीय संघ जिंकला असं कळलं. तुम्ही ट्रॉफी घ्यायला नकार दिला पण तुम्ही खेळतात. तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर खेळत आहात. देशाच्या पंतप्रधानांकडून ही प्रेरणा घेतली आहे. जय शाह आल्या पासून भारतीय क्रिकेट बोर्डात महाराष्ट्र दिसत नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भारतीय संघाच्या (ACC) अध्यक्ष व पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

Web Title: Abu azmis big statement on ind vs pak match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Abu Azmi
  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Maharashtra Politics news
  • Team India

संबंधित बातम्या

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके
1

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम
2

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम

  IND vs PAK : तिलक वर्माने टी-२० मध्ये रचला इतिहास! भारतासाठी ‘हा’ भीम पराक्रम करून दिला  क्रिकेट विश्वाला धक्का..
3

  IND vs PAK : तिलक वर्माने टी-२० मध्ये रचला इतिहास! भारतासाठी ‘हा’ भीम पराक्रम करून दिला  क्रिकेट विश्वाला धक्का..

Varun Chakravarthy कोणाला ऐकत नाही! ट्राॅफी नाही तर काय झालं, कपला मिठी मारुन झोपला मिस्ट्री स्पिनर… काही तासात Post Viral
4

Varun Chakravarthy कोणाला ऐकत नाही! ट्राॅफी नाही तर काय झालं, कपला मिठी मारुन झोपला मिस्ट्री स्पिनर… काही तासात Post Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.