
Mahayuti, ShivSena Shinde, BJP, Sanjay Gaikwad, Abdul Sattar,
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी आहे. एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ५० आमदार बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्तेमध्ये सोबत आले. अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा ही खरी आहे.”
यासंदर्भात बोलताना उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगर जागेसाठी एकत्र बसून त्याच्यावर तोडगा निघेल. महायुती आणि आम्ही १७ जागा लढवत आहोत. त्या जागा महायुती जिंकणार, पूर्ण नंबर मेजॉरिटी महायुतीकडे आहे, महायुतीचे नियम पाळायचे हे अब्दुल सत्तार यांना सांगितलं आहे. ४ तारखेपर्यंत सर्व नीट होणार.”
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने वेगळी भूमिका घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याचेही त्यांनी नमूद केले. भंडाऱ्यातील आमदार नरेंद्र बोंडेकर यांनीही भाजपवर थेट निशाणा साधला. अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड यांनी मांडलेल्या तक्रारी सत्य असल्याचे सांगत त्यांनी भंडारा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असल्याचा दावा केला, तसेच समन्वय समितीत शिवसेना नेत्यांचा अपमान होत असल्याचा आरोप करत परिणय फुके यांच्यावरही त्यांनी टीका केली.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश मला मान्य आहे. पुढे अंबादास दानवे यांच्या भेटीवर बोलताना सत्तार म्हणाले, आम्ही मुस्लिम असल्याने सर्वांना गळाभेट घेऊन भेटतो. मात्र जो काही निर्णय असेल तो एकनाथ शिंदेच घेणार, असे ते म्हणाले.
संजय गायकवाड म्हणाले, अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना अजूनही अर्थ खाते मित्र पक्षाकडून मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत देखील आमच्यासारखा खेळ होतो आहे का? असे दिसून येत आहे. माझ्या मतदारसंघात देखील मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असून, अशा प्रकारे मित्र पक्ष असताना एकमेकांचे खच्चीकरण करणे हे महायुतीसाठी हिताचे नाही, असे गायकवाड म्हणाले.