Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हा प्रशासनाने केलेला खून, शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत; मुलुंड मेट्रो अपघातावरुन अमित ठाकरेंचा संताप

मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यावरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 17, 2026 | 12:53 PM
Amit Thackeray criticizes state government in social media post over Mulund Metro accident case

Amit Thackeray criticizes state government in social media post over Mulund Metro accident case

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोची कामे सुरु आहेत. यामुळे अनेकदा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. मात्र दोन दिवसांपूर्वी मेट्रोचा एक स्लॅब कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. (Mumbai News) यावरुन नागरिकांची सुरक्षा आणि मेट्रोच्या कामाची गुणवत्ता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन हा प्रशासनाने केलेला खून असल्याचे म्हणत टीका केली.

अमित ठाकरे यांनी लिहिले आहे की, मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा ‘अपघात’ नाही, तर प्रशासनाने केलेला ‘खून’ आहे! निकृष्ट दर्जाचं काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेला ‘जुगाड’ आणि वारंवार ताकीद देऊनही झालेलं दुर्लक्ष… याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

पुढे लिहिले आहे की, “तसेच, एकीकडे सरकारच्या हलगर्जीपणामुळे सामान्य मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूचे स्लॅब कोसळत असताना, दुसरीकडे सरकार कोस्टल रोडवर गाणी वाजवणारे रस्ते बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. जपानची नक्कल करताना सरकार हे विसरतंय की तिथल्या जनतेला ‘जिविताची हमी’ आणि सर्व ‘मूलभूत सोयी’ मिळाल्या आहेत; आपल्याकडे घराबाहेर गेलेला माणूस जिवंत घरी परतेल की नाही याची खात्री नसताना हे बालिश हट्ट कशासाठी? प्रशासनाचा प्राधान्यक्रम नक्की काय आहे? ज्या गोष्टींची गरज नाही तिथे कोट्यवधी रुपये उधळायचे आणि जिथे लोकांच्या जिवाचा प्रश्न आहे तिथे मात्र रीतसर दुर्लक्ष करायचं?,” अशी टीका अमित ठाकरे यांनी केली आहे.

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “दुर्दैवाने, हा काही पहिलाच ‘अपघात’ नाही. अशा अनेक घटना मुंबईकरांच्या जीवावर बेतल्या आहेत. कधी पूल कोसळतो, कधी होर्डिंग तर कधी बांधकामाचे स्लॅब अंगावर पडून निष्पाप लोकांचे प्राण जातात. जास्तीत जास्त चौकशीचे आदेश दिले जातात, पण परिस्थिती बदलत नाही. अनियंत्रित गर्दीमुळे होणारे रेल्वे अपघात, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे लोकांचे जाणारे प्राण याची तर सरकार दरबारी दखलही घेतली जात नाही !”

हे देखील वाचा : ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक

“धक्कादायक बाब म्हणजे, मुलुंड प्रकरणी कंत्राटदाराला ६ कोटींचा दंड होतो, पण ज्या कुटुंबाचा आधार गेला त्यांना फक्त ५ लाखांची शुल्लक मदत ? एखाद्या कुटुंबाची राखरांगोळी झाल्यावर त्यांच्या दुःखाची अशी ‘शून्यात’ गणना करताना सरकारला लाज कशी वाटत नाही?
नुकतीच अमेरिकेतील एका अपघाताची बातमी आपण वाचली. तिथल्या प्रशासनाच्या चुकीमुळे एका भारतीय मुलीचा मृत्यू झाला, तेव्हा तिथल्या सिस्टीमने जबाबदारी स्वीकारून कोट्यवधींची भरपाई दिली. प्रगत राष्ट्रांमध्ये माणसाच्या जिवाला किंमत असते, पण आपल्याकडे? आपल्याकडे लोकांच्या जिवापेक्षा सरकारला ‘इव्हेंटबाजी’ महत्त्वाची वाटते. आम्हाला गाणी गाणारे रस्ते नकोत, तर दर्जेदार रस्ते हवे आहेत ! मुंबईकर टॅक्स भरतोय तो तुमच्या ‘इनोव्हेटिव्ह स्टंट ‘साठी नाही, तर एका सुरक्षित आयुष्यासाठी… त्यामुळे हे असले ‘म्युझिकल’ नखरे थांबवा आणि आधी लोकांना एक सुरक्षित आयुष्य देण्याची ‘बेसिक’ मागणी पूर्ण करा. जनतेच्या जिवाशी चाललेला खेळ शांत…,” अशी टीका मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे.

Web Title: Amit thackeray criticizes state government in social media post over mulund metro accident case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • amit thackeray
  • Mulund Accident
  • Mumbai Metro

संबंधित बातम्या

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
1

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई मेट्रो पुल दुर्घटनेनंतर कलाकार आक्रमक; Varun Grover चे भ्रष्टाचारावर वक्तव्य, Rahul Vaidya चीही प्रतिक्रिया
2

मुंबई मेट्रो पुल दुर्घटनेनंतर कलाकार आक्रमक; Varun Grover चे भ्रष्टाचारावर वक्तव्य, Rahul Vaidya चीही प्रतिक्रिया

मुंबई मेट्रो भरतीसाठी करा अर्ज! विविध पदासाठी भरती; ₹2.80 लाखांपर्यंत पगाराची संधी
3

मुंबई मेट्रो भरतीसाठी करा अर्ज! विविध पदासाठी भरती; ₹2.80 लाखांपर्यंत पगाराची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.