BJP Nitesh Rane reply to Waris Pathan's criticism of AIMIM Ahilyanagar Sabha Political news
Nitesh Rane vs Waris Pathan : अहिल्यानगर : एआयएमआयएम पक्षाची अहिल्यानगरमध्ये सभा झाली. यामधील पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन औवेसी यांच्यासह महिला नेत्या रुहीनाज शेख आणि वारीस पठाण यांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. वारीस पठाण यांनी अहिल्यानगरमधील सभेमध्ये चितावनीखोर भाषण दिले. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी डिवचले. यानंतर मंत्री नितेश राणे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
वारीस पठाण यांनी मंत्री नितेश राणे यांचा नेपाळी असा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले की, ‘मस्जिदमध्ये घुसून मुस्लिमांना मारणार असे नितेश राणे म्हणतात. पण तो दोन पायावर येतील मात्र स्ट्रेचरवर जातील. आम्ही कुणाला भीत नाही. आम्ही संविधानाचा आदर करतो आणि मर्यादा पाळतो. राणे हे द्वेष पसरवण्याचे काम करतात. त्यांना मंत्री बनवलं आहे. मात्र तरीही ते तरीही ते अशी विधाने करत असतात.’असे विधान वारीस पठाण यांनी केले. यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत वारीस पठाण यांचा खरपूस समाचार घेतला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री नितेश राणे हे पठाण यांच्या टीकेवर प्रत्युत्त देताना म्हणाले की, ‘जागा आणि वेळ कळवा किंवा मस्जिद निवड. मी तिथे येतो, धमक्या देऊ नका, तुम्हाला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे. मी आधीच म्हटलं की भुंकणारी कुत्री चावत नसतात. ही तर नसबंदीवाली पिलावळ आहे. राज्यातील वातावरण खराब करायचं नाही. आमचं सरकार सभेची परवानगी देतं आहे, म्हणून बोलू शकता, नाहीतर मस्जिदीच्या भोंगेयातून बोलावं लागलं असतं.’ अशा जहरी शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “भोकने वाले कुत्ते काटते नही, ही जी हिंदीत म्हण आहे, याचं उत्तम उदहारण कालची सभा होती. तुम्ही एकाबाजूला म्हणता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, कायदा-सुव्यवस्था मानतो. पण दुसऱ्याबाजूला महाराष्ट्र सरकारने अहमदनगरच नाव बदलून अहिल्यानगर केलं, औरंगाबादच नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं, ते तुम्हाला मान्य नाही. हे काय तुमच्या अब्बाचं पाकिस्तान, इस्लामाबाद आहे का? तिसरा डोळा उघडायला लावू नका. आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावले जात आहेत. हिरव्या सापांची वळवळ झालीय. इथे हिंदुत्ववादी सरकार आहे,’ असे भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी म्हटले असून जोरदार हल्लाबोल केला.