
Aamir Khan, Nitesh Rane, Bollywood, Maharashtra Politics,
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे एका कार्यक्रमादरम्यान नितेश राणेंनी आमिर खानच्या तिसऱ्या विवाहावरून आगपाखड केली आहे. एका माध्यमांशी संवाद साधताना राणे म्हणाले, “मी कोणाच्या लग्नाला उपस्थित राहावे हा माझा विषय नाही. पण जे तरुण हिंदू त्याला सेलिब्रिटी मानतात, त्यांनी त्याच्याकडून काय प्रेरणा घ्यावी याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जेव्हा प्रसिद्ध सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत निर्णय घेतात, तेव्हा त्याचा समाजावर परिणाम होतो. हिंदू समाजाने अशा व्यक्तींना किती पाठिंबा द्यावा याचा विचार केला पाहिजे.
यावेळी नितेश राणे यांनी आमिर खानला ‘लव्ह जिहाद’चा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणत त्याची खिल्लीही उडवली. तसेच “हिंदू समाजाने आणि त्याचे चित्रपट पाहणाऱ्या हिंदू तरुणांनी अशा लोकांना विचारपूर्वक वाढवले पाहिजे.” असंही त्यांनी नमुद केले. आपल्या निर्णयांचा आणि विचारांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे, अभिनेता आमिर खानने ५ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या पाली हिल निवासस्थानी एका खाजगी समारंभात लग्न केले. त्याने वेलनेस आणि ब्युटी प्रोफेशनल गौरी स्प्रॅटसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नापूर्वी हे दोघे सुमारे एक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर गौरी आमिरची जीवनसाथी बनली आहे. हे आमिर खानचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी आमिर खानने काही वर्षांपूर्वी रीना दत्ता यांच्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर त्याने चित्रपट निर्माती किरण रावशी लग्न केले, पण नातेसंबंध टिकल्याने रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत घटस्फोट घेतला. आता आमिर खानने तिसऱ्यांदा गौरी स्प्रॅटशी लग्न केले आहे.