Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरेंच्या युतीचा फटका सर्वात जास्त राज ठाकरेंना…! देवेंद्र फडणवीसांनी सांगितली राजनीती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीवर भाष्य केले. तसेच राज ठाकरेंसोबत युती करण्याबाबत भाष्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 12, 2026 | 03:19 PM
CM Devendra Fadnavis on Uddhav Thackeray And Raj Thackeray bmc election 2026

CM Devendra Fadnavis on Uddhav Thackeray And Raj Thackeray bmc election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • देवेंद्र फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका
  • ठाकरे बंधूंच्या युतीत राज ठाकरेंचे नुकसान
  • ठाकरे बंधूंच्या युतीने कोणता तीर मारला
Devendra Fadnavis : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची (Maharashtra Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला असून जोरदार राजकारण रंगले आहे. 29 पालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यामुळे प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीवर (Thackeray brothers alliance) भाष्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच अनेक प्रभागांमध्ये बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये जास्त भाजपचे असल्यामुळे टीका केली जात आहे. याबाबत फडणवीस म्हणाले की, “फक्त आमचे आले हे म्हणणं चुकीचं आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही आला. अपक्षाची काय ताकद असते. पण तोही आला ना. किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार नाही दिला,. उबाठाने नाही दिला. शरद पवारांनी नाही दिला. अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले. याचं उदाहरण कल्याण डोंबिवली आहे. कल्याण डोंबिवलीत आमचे मागच्यावेळी १०५ निवडून आले. आमची शक्ती वाढली. त्यांच्याकडे नेतेच राहिले नाहीत,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध ‘दलिंदर आणि बिलंदर’ जोडी’, ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या युतीवर देखील फडणवीसांनी भाष्य केले. राज ठाकरेंसोबत युती का केली नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, “आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्यासोबत स्पेस नाही. जेव्हा आले तेव्हा हिंदुत्व घेतलं होतं. आता त्यांनी हिंदुत्व सोडून दिलं. त्यांनी जुनीच भूमिका घेतली. त्यांनी मराठी माणसाबद्दल बोलले तर हरकत नाही. पण रिक्षावाल्यांना मार, टॅक्सीवाल्यांना मार हे काही आम्हाला जमणार नाही. त्यांचं आणि आमचं जमलं नाही. ते काही आमचे शत्रू नाही. ते पुढेही मित्रच राहतील. पण या निवडणुकीत त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे. मी मित्र म्हणून नाही राजकीय निरीक्षक म्हणून सांगतो. सर्वात मोठं नुकसान राज ठाकरेंना होईल.” अशी राजकीय भविष्यवाणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

हे देखील वाचा : “ही सगळी लाचार माकडं!” उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला; जाणून घ्या भाषणातील ठळक मुद्दे

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत आणून उभे करायचे का. भारताच्या लोकसभेत ३५ खासदार बिनविरोध गेले. त्यातील ३२ काँग्रेसच्या काळात गेले. पहिल्या तीन निवडणुकीचं सोडून द्या. आताचं आहे. मागच्या निवडणुकीत गेले. लोकसभेत बिनविरोध जाऊ शकतात. तर महापालिकेत का जाऊ शकत नाही. मुंबई नाशिकच्या बाहेर हे प्रचाराला गेले सांगा. दीड दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. आपण हरलो तर ब्रँड राहणार नाही. म्हणून घराबाहेर पडले नाही. दोघे एकत्र आले तर कोणता तीर मारला,” असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावला आहे.

Web Title: Cm devendra fadnavis on uddhav thackeray and raj thackeray bmc election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Local Body Election
  • Thackeray Brothers Alliance

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, देवेंद्र फडणवीसांची माहिती
1

Devendra Fadnavis : जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, देवेंद्र फडणवीसांची माहिती

Asha Bhosle : सुरांची सुंदर बाग आज उजाड…! CM देवेंद्र फडणवीसांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केला शोक
2

Asha Bhosle : सुरांची सुंदर बाग आज उजाड…! CM देवेंद्र फडणवीसांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केला शोक

खानवडीत ‘ज्योती-सावित्री’ शाळेचे उद्घाटन; महिलांच्या ३३% आरक्षण निर्णयाला फुले विचारांची जोड
3

खानवडीत ‘ज्योती-सावित्री’ शाळेचे उद्घाटन; महिलांच्या ३३% आरक्षण निर्णयाला फुले विचारांची जोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.