Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालंय…; निकाल लांबणीवरुन वडेट्टीवार आक्रमक

3 डिसेंबरला लागणारा निकाला आता न्यायालयाच्या निर्णयानंतर 21 तारखेला लागणार आहे. यावरुन कॉंग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत नाराजी व्यक्त केली.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 03, 2025 | 03:08 PM
Congress Vijay Wadettiwar target election commission on delay in local body election result

Congress Vijay Wadettiwar target election commission on delay in local body election result

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक आयोगाने निकाल उशीरा लागणार असल्याने विरोधक आक्रमक
  • विजय वडेट्टीवार यांचा कार्यपद्धतीवर आक्षेप
  • ईव्हीएममध्ये घोळ होण्याचा संशय
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूका पार पडल्या आहेत. मतदान पार पडले असले तरी निकालावर मात्र टांगती तलवार आहे. 3 डिसेंबरला लागणारा निकाला आता न्यायालयाच्या निर्णयानंतर 21 तारखेला लागणार आहे. मात्र ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते असा संशय विरोधकांकडून केला जात आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ईव्हीएममध्ये काही प्रोब्लेम झाला तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.

विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निकाल पुढे ढकल्यावर नाराजी व्यक्त केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य निवडणूक आयोग, मला वाटतं की त्यांच्या अकलेची दिवाळे निघाले असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रात अनेक निवडणुका झाल्या मात्र एवढा गोंधळ आणि पोरखेळ कधीच झाला नव्हता, मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रात हा निवडणुकीचा धिंगाणा दिसतोय त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाअंतर्गत त्यावेळी कोणाच्या दबावात घाईघाईत तारखा घोषित केल्या, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुढे ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की 50% च्या वर कुठले आरक्षण जाता कामा नये, असं असताना निवडणूक आयोगाने 50% च्या वर आरक्षणाच्या मर्यादा पाळल्या नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून निवडणुका घेत आहोत, या सगळ्या लोकांना वेठीस धरणे, सात- आठ वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि त्याही व्यवस्थित न करणे यासाठी राज्य निवडणूक आयोग सोबत राज्य सरकारही जबाबदार आहे. उद्या ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली तर कोण जबाबदार? ईव्हीएम हॅक करता येतात, करा तुमच्या मनाप्रमाणे, निवडणुका घेताच कशाला? घोषणा करून टाका भाजपच्या लोकांना विजयी झाले म्हणून. आता अठरा दिवस जे मिळत आहेत यातून लोकांचा विश्वास कसा राहील, त्यामुळे या सर्व प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि राज्य सरकारही दोषी आहे, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

हे देखील वाचा : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!

पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, या दोघांच्या सरकारचे लोक नेते जे बोलत आहेत, सरकारच्या इशाऱ्यावर चालणारा निवडणूक आयोग झाला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाचे ज्ञानेश्वर यांनी सांगितले आहे की जगात भारताच्या निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शीपणे होतात. हुकमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे हेच दिसतय. आता ओबीसींच्या जागा कमी होणार याला कोण जबाबदार आहे? 20 दिवसानंतर निवडणूक घ्या म्हटलं तेव्हा सरकारने विरोध का नाही केला? कारण त्यांनाही तेच पाहिजे असेल. त्यांना अपयश मिळत होता म्हणूनच या निवडणुका लांबणीवर टाकल्या, भाजपच्या अंतर्गत सर्वे मध्ये 175 जागा जिंकत असल्याचा सर्वे होता, त्यामुळे हे फिक्सिंग आहे आणि तो सर्व लोकांना मूर्ख बनवण्यासाठी दाखवण्यात आला, असा आरोप कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

Web Title: Congress vijay wadettiwar target election commission on delay in local body election result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • Congress
  • political news
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

‘निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचा बाहुला, रावणापेक्षाही जास्त सत्ताधाऱ्यांना अहंकार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका
1

‘निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचा बाहुला, रावणापेक्षाही जास्त सत्ताधाऱ्यांना अहंकार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका

बिहारनंतर पश्चिम बंगालसह ‘या’ राज्यांत होणार निवडणुका; अमित शहांकडे येणार मोठी जबाबदारी
2

बिहारनंतर पश्चिम बंगालसह ‘या’ राज्यांत होणार निवडणुका; अमित शहांकडे येणार मोठी जबाबदारी

नगराध्यक्षांसह उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद; EVM मध्ये तांत्रिक बिघाडानंतरही सोलापूरमध्ये मतदान जोरदार
3

नगराध्यक्षांसह उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद; EVM मध्ये तांत्रिक बिघाडानंतरही सोलापूरमध्ये मतदान जोरदार

निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव, बोगस मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: काँग्रेसची मागणी
4

निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव, बोगस मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: काँग्रेसची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.