प्रभू श्रीरामांनी आपल्याला दिली जीवनाची मूल्ये; मुख्यमंत्री फडणवीसांची भावना
नाशिक : नुकताच उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळा पार पडला. आता लवकरच नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. नाशिमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जोरदार तयारी केली जात आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी सरकारची आढावा बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दादा भूसे आणि गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा राहिलेला असताना दोन्ही नेते एकत्रितपणे दिसले.
पत्रकार परिषदेला संबोधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारचे मी धन्यवाद मानतो की आमच्या मागणीला प्रतिसाद देत कांद्यावरचे निर्यात शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 20 टक्के निर्यात शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विशेषतः नाशिक, पुणे आणि नगरमधील शेतकरी या निर्णयामुळे सुखावला आहे. ही शहरं कांद्याची हब आहेत. यातील शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. यापुढे देखील कांदा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
प्रयागराजमधील कुंभमेळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये देखील मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारकडून पूर्ण तयारी आणि उपाययोजना केली जात आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेत पाहणी देखील केली आहे. कुशावर्त तिर्थाची पाहणी केली आहे. त्र्यंबकेश्वराच्या विकासाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. यावेळी दोन्ही मंत्री उपस्थित होते, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करत आहोत. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरचा देखील विकास केला जाणार आहे. कारण हे एक प्रमुख ज्योतिर्गलिंग आहे. देशभरातून भाविक येथे येत असतात. जवळपास 1100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये दोन टप्पे असतील. पहिला टप्पा सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत होईल तर दुसरा टप्पा त्यानंतर पूर्ण केला जाईल. यामध्ये दर्शनासाठी, पार्किंगसाठी व्यवस्था, कोरिडॉर, शौचालय आणि कुंडांची स्वच्छता आणि त्यांचे पुर्नवसन केले जाणार आहे. मंदिराचा काही भाग पुनर्संचयित करण्यात येणार असून आवश्यक त्या सुविधा दिल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याासाठी 11 पुल बांधत आहोत. घाटांवर नवीन सोयी सुविधा तयार करण्यात येतील. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहिले पाहिजे, यासाठी आराखडा तयार केला आहे. सिंहस्थच्या आधी ही काम पूर्ण करण्यात येतील. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात. त्या सर्वांची योग्य सोय करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.