Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे," असं सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आमचं कोणतंही वैयक्तिक स्वार्थाचं राजकारण नाही. आम्हाला महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेत विकसित भारताच्या दिशेने काम करायचं आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 08, 2025 | 04:05 PM
Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
Follow Us
Close
Follow Us:
  • एकनाथ शिंदे ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले
  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले
  • पण फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपने एकनाथ शिंदे बाजूला केलं

Eknath Shinde on BJP and Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षांपूर्वी जून २०२२ मध्ये एक मोठा भुकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार फोडत शिवसेनेतून फारकत घेतली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगानेही त्यांच्या वेगळ्या गटाला शिवसेना असल्याचे शिक्कामोर्तब केले. एकनाथ शिंदेंनी फारकत घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ४० आमदारांसोबत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.पुढील अडीच वर्षे त्यांनी राज्याचं नेतृत्त्व केलं.

Prashant Kishor News: ..तर राजकारण सोडून देईन; बिहारच्या निवडणुकांबाबत प्रशांत किशोरांचा खळबळजनक

भाजपाने शिंदेंना बाजूला सारलंय का?

अडीच वर्ष राज्यात सत्तेत राहिल्यानंत २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३८ जागा जिंकत राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. पण यावेळी मात्री भाजपने मुख्यमंत्री पदाची सुत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सोपवली. तर,एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची सुत्रे देण्यात आली. विधानसभेतील विजयानंतर एकनाथ शिंदे यांनी अनेकदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. पण १३२ जागा जिंकल्यामुळे भाजपने मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना भाजपकडून खरा पाठिंबा मिळाला. पण गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यापासून त्यांनी एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्यास सुरूवात केल्याची चर्चा आहे.

यावरून अनेकदा राजकीय वर्तुळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात वादाच्या ठिणग्या पडल्याचेही समोर आले आहे. या सर्व प्रकारावर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

“फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपाने तुम्हाला बाजूला केलं आहे का?” या प्रश्नावर उत्तर देतना एकनाथ शिंदे म्हणाले, “मला असं वाटत नाही की भाजपाने मला बाजूला केलं आहे, मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार – हे दोन्ही उपमुख्यमंत्री – आणि मी, आम्ही तिघं एकत्र एक टीम म्हणून काम करत होतो. आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही दोघं उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहोत. त्यामुळे आमचं टीमवर्क तसंच सुरु आहे.”

पाण्याच्या राक्षसाची गजराजाशी जबरदस्त झुंज! हत्ती पाण्यात शिरताच मगरीने सोंड धरली अन्…; थरारक दृश्याचा Video

“विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत” – उपमुख्यमंत्री शिंदे

“विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आमचं कोणतंही वैयक्तिक स्वार्थाचं राजकारण नाही. आम्हाला महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेत विकसित भारताच्या दिशेने काम करायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचं स्वप्न पाहिलं आहे, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या विकासयात्रेसाठी आम्ही तीन टप्पे निश्चित केले आहेत – २०२९, २०३५ आणि २०४७. या प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी आमचं नियोजन आणि अंमलबजावणी सुरु आहे,” असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.

 

Web Title: Has bjp sidelined you since fadnavis became the chief minister eknath shinde gave the answer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • BJP Politics
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Ulhasnagar News: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी उल्हासनगरात शिंदेंची नवी चाल; बडा नेत्याचा जाहीर पाठिंबा
1

Ulhasnagar News: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी उल्हासनगरात शिंदेंची नवी चाल; बडा नेत्याचा जाहीर पाठिंबा

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!
2

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

Vice President Election : भाजपच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी दिसले चक्क शेवटच्या रांगेत; चर्चांना उधाण
3

Vice President Election : भाजपच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी दिसले चक्क शेवटच्या रांगेत; चर्चांना उधाण

Rohit Pawar News: देवाभाऊ’साठी कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या? रोहित पवारांनी शोधून काढलं
4

Rohit Pawar News: देवाभाऊ’साठी कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या? रोहित पवारांनी शोधून काढलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.