
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज 'मातोश्री'वर महत्त्वपूर्ण बैठक; पक्षफुटीच्या भीतीचे चर्चा?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत फूट पडल्याचे पाहिला मिळाल आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत पक्षाला रामराम केला. असे असताना आता शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष सातत्याने कमकुवत होत चालला आहे.
आमदार आणि खासदारांनंतर आता ही पडझड महाराष्ट्र विधान परिषदेपर्यंतही पोहोचली आहे. या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांनी आपल्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आमदारांची ही आपत्कालीन बैठक आज, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीचा मुख्य अजेंडा काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या या बैठकीचा मुख्य उद्देश नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे आणि इतर नेत्यांना पक्ष सोडण्यापासून रोखणे हा आहे.
तसेच, राज्य विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यासाठी पक्षाची रणनीती अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या बैठकीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे.
आता ‘ऑपरेशन टायगर-३’ ची भीती?
शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे की, ‘ऑपरेशन टायगर ३.०’ आधीच सुरू झाले असून, १४ आमदार उपमुख्यमंत्र्यांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे इतर ज्येष्ठ नेते, ज्यामध्ये मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे, त्यांनी अधिकृतपणे अशा कोणत्याही ऑपरेशनचा इन्कार केला आहे.
‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’; मुख्यमंत्र्यांचा टोला
अयोध्या राम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरू केलेल्या ‘रामरक्षा आंदोलना’बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना अखेर प्रभू रामाची आठवण झाली, याचा आनंद व्यक्त करत फडणवीस म्हणाले की, रामाच्या मार्गावर चालणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.
ऑपरेशन टायगर 3 कधी होईल, तेही कळणार नाही
ऑपरेशन टायगर 3 कधी होईल, तेही कळणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावातात अनेक आमदार आणि माजी मंत्री शिवसेनेत येणार आहेत. केंद्रात शिवसेनेचा चेहरा कोण असेल, याचा निर्णय शिंदे साहेब राजकीय परिस्थितीनुसार घेतील. ठाकरे गट काय करतो यापेक्षा आमचा भर संघटना अधिक मजबूत करण्यावर आहे, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
‘एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल’; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला