Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू

प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार, नव्या बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र, मालमत्ता व कर्मचाऱ्यांचे विभाजन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, शेतकरी व व्यापाऱ्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 06, 2026 | 05:30 PM
Sangli, Jayant Patil, APMC, Sangli News,

Sangli, Jayant Patil, APMC, Sangli News,

Follow Us
Close
Follow Us:
  • सांगली बाजार समितीचे अखेर त्रिभाजन
  • जत आणि कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र समित्यांची घोषणा
  • बाजार समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव
 

Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा राजकीय दणका देत राज्य शासनाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाचा निर्णय अखेर अमलात आणला आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत यापूर्वी या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता अंतिम अधिसूचना काढत सांगली, जत आणि कवठेमहांकाळ अशा स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या सत्ताकेंद्रावर थेट परिणाम झाल्याचे मानले जात आहे. ५ मार्च २०२६ रोजी जयंत पाटील यांचे समर्थक आनंदराव नलवडे यांची सभापतीपदी निवड झाली होती. अवघ्या एका महिन्यातच शासनाने त्रिभाजनाचा निर्णय घेतल्याने हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Sharad Pawar Wheelchair oath : शरद पवारांची जिद्द अन् चिकाटीचे सर्वत्र कौतुक; व्हीलचेअरवरुन घेतली राज्यसभेची शपथ

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत पणन विभागामार्फत तालुकास्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील ६८ तालुक्यांमध्ये नवीन बाजार समित्या उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे.

सांगली बाजार समितीच्या स्थापनेपासून जत, कवठेमहांकाळ व इतर उपबाजारांचा समावेश होता. मात्र विस्तीर्ण कार्यक्षेत्रामुळे प्रशासन व आर्थिक व्यवस्थापनावर ताण येत होता. वसंतदादा मार्केट यार्डमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जत, कवठेमहांकाळ व ढालगाव येथे खर्च होत असल्याने सांगली-मिरज भागातील विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होती.

या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स तसेच शेतकरी यांनी स्वतंत्र बाजार समित्यांची मागणी सातत्याने केली होती. आमदार सुधीर गाडगीळ यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सातत्याने मांडला होता.

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत जय पवारांची मोठी एन्ट्री! अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची मास्टरस्ट्रोक रणनीती 

दरम्यान, बाजार समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असून, जयंत पाटील गटाचे वर्चस्व होते. त्यामुळे या त्रिभाजनामुळे महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार, नव्या बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र, मालमत्ता व कर्मचाऱ्यांचे विभाजन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, शेतकरी व व्यापाऱ्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

प्रमुख कारणे

विस्तीर्ण कार्यक्षेत्रामुळे वाढलेला प्रशासकीय ताण

उत्पन्नाचे असमतोल वितरण; मिरज भागावर अन्याय

शेतकरी व व्यापाऱ्यांची दीर्घकालीन मागणी

तालुकास्तरावर स्वतंत्र बाजार समितीची शासनाची धोरण

सत्तासमीकरणाला धक्का

गेल्या साडेतीन वर्षांपासून बाजार समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. खासदार विशाल पाटील, जयंत पाटील, आमदार रोहित पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि विक्रम सावंत या गटाचे वर्चस्व होते. त्रिभाजनामुळे या सत्ताकारणाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

 

 

Web Title: Major setback for jayant patil sangli apmc split into three units jath and kavathe mahankal get separate boards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • jayant patil
  • Sangli

संबंधित बातम्या

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग
1

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.