सांगलीच्या कवलापूर यात्रेत धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. संतापलेल्या आरोपीने दगडाने मारहाण करत विश्वास सुतारचा खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
खा. विशाल पाटील यांनी पडळकरांना प्रत्युत्तर देत, “लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार हे कुणाच्या घोषणांनी ठरत नाही, तर जनतेच्या मतांनी ठरते. माझ्याबाबतचा अंतिम निर्णय जनताच घेईल,” असे स्पष्ट केले.
प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार, नव्या बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र, मालमत्ता व कर्मचाऱ्यांचे विभाजन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, शेतकरी व व्यापाऱ्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
सांगलीतील आटपाडी तालुक्यात बापाने चोरीच्या संशयातून दोन मुलींना उलटे टांगले. यात एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून तपास सुरू आहे.
रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोल्हापूर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची लाकडाने मारहाण करून हत्या केली. भांडणादरम्यान नातेवाईकांसमोरच हा प्रकार घडला. आरोपीला अटक करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
“तुमचा काळा इतिहास मला बाहेर काढायला भाग पाडू नका,” अशा शब्दांत संजय पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
सांगली जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या ६०.९४% प्रवेशांची नोंद. गुढीपाडव्याला ११,१४२ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश. वाळवा तालुका पिछाडीवर तर विटा-तासगाव आघाडीवर.
Education Director Killed : पं. विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६०, रा. मारुती मंदिराजवळ, पलूस) यांचा अज्ञातांनी निघृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस…
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी 'पीएम सूर्य घर' योजनेचा आढावा घेतला. सौर विक्रेत्यांच्या समस्या सोडवून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले आहेत.
सांगलीतील चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांनी अचानक राजीनामा दिला आहे. माजी खासदार संजय पाटील यांच्या गावात घडलेल्या या राजकीय बदलामुळे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.
आ. सुहास बाबर यांनी लक्षवेधीद्वारे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीसमोरील अडचणी सभागृहात मांडल्या. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रियेवर परिणाम झाला
सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या (अजित पवार) गटनेते निवडीवरून वाद. जिल्हाधिकाऱ्यांवर दबावाचा आरोप करत विलासराव जगतापांनी व्यक्त केला संताप. सत्तास्थापनेचे समीकरण नव्या वळणावर.
सांगली जिल्हा परिषदेत भाजप गटनेतेपदी आशिष जाधव यांची निवड करण्यात आली आहे. महायुतीकडे ३१ जागांचे बहुमत असून अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
Sangli Politics: सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा असून त्यांनी मिरज दंगल घडवल्याचा दावा खोत यांनी केला आहे.
सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वाधिक १८ जागा जिंकत हा पक्ष बाजीगर ठरला आहे. ६१ जिल्हा परिषद गट आणि १२२ पंचायत समिती गणांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे…
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू असताना, चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील देवर्डे येथील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली.