सांगलीत दलित महासंघाचे मोहिते गटाध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवसाच्या दिवशीच रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याने निर्घृण हत्या केली. संतप्त जमावाने आरोपीला बेदम मारहाण केली असून पोलीस तपास सुरू आहे.
सांगलीतील तबेल्यात शिवीगाळीच्या रागातून दोन मित्रांनी अमीर कन्नुरेचा निघृण खून केला. दारूच्या नशेत झालेल्या वादाचं रूपांतर हत्या झाली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे.
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. शासकीय कामात अडथळा आणत पथकातील अधिकाऱ्यांवर धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली आहे.
सांगलीतील इस्लामपूर येथे २५ वर्षीय नवविवाहित अमृताने सासरच्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. सासरकडून माहेरहून २ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला जात होता. पाच जणांवर गुन्हा दाखल.
वाळवा तालुका शांत आहे. पण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सारख्या माणसाने जिल्हात अशांतता निर्माण केली असून या मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असे सुष्मिता जाधव म्हणाल्या.
राज्य शासनाच्या आजपर्यंतच्या कामकाजात सांगली जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, जिल्हयाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करू असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हटले.
सांगलीच्या मनेराजुरी गावात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली.
विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच आज शेवटचा दिवस असून आज मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली आहे. काय असणार आह इ्स्लामपूरचे नवीन नाव नाव जाणून घ्या?
Koyna Dam: कोयना धरण हे राज्याच्या दृष्टीने महत्वाचे धरण समजले जाते. कोयना धारण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसेच नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात…
सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत अल्पवयीन संशयितासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीचे सरासरी क्षेत्र दोन लाख ४६ हजार ६११८.७१ हेक्टर आहे. यापैकी ८४ हजार ८३६.४० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
शक्तिपीठमुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे. सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे.
कमी मार्क पडल्याच्या रागातून शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या वडिलाने आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केली. मारहाणी नंतर मुलीने जीव सोडला. तिच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.
सांगलीतील मिरज येथील भरदिवसा गोळीबाराची घटना समोर आली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. ही घटना शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर घडली आहे. पोलिसांनी संचयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
वैभव साबळे यांनी वेंगुर्ले शहरात मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी त्यांनी कोरोना काळात शहरातील नागरिक, व्यापारी यांना प्रचंड त्रास दिला होता.
मुसळधार पावसामुळे मुंबईत वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून, सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे.