Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bachchu Kadu Nagpur: बच्चू कडू अन् जरांगे पाटील यांची अनोखी युती? आंदोलनातून महायुती सरकारला आणले नाकी नऊ

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आंदोलन छेडले असून त्यांना आंदोलनाला आणखी बळकटी मिळाली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 30, 2025 | 12:03 PM
Maratha Leader Manoj Jarange patil with bacchu kadu shetkari andolan in nagpur

Maratha Leader Manoj Jarange patil with bacchu kadu shetkari andolan in nagpur

Follow Us
Close
Follow Us:

Bachchu Kadu Nagpur: मुंबई : महाराष्ट्रामध्ये आंदोलन, उपोषण आणि मागण्या यांनी राजकारण तापवले आहे. दररोज नवीन मागण्यांसह नेते उपोषण करत आहेत. माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडू यांनी सर्व शेतकऱ्यांनी पूर्णपणे कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी आंदोलन छेडले असून आता त्यांच्या आंदोलनाला आणखी बळकटी मिळाली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले आहेत.

बच्चू कड़ू यांनी शेतकऱ्यांच्या मागणींसाठी नागपूरमध्ये रस्ता रोको आंदोलन केले. यानंतर कडू यांच्यासह हजारो शेतकरी हे नागपूरमध्ये आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून सरकारचे प्रतिनिधी हे बच्चू कडूंसोबत संवाद साधत आहेत. दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. जरांगे पाटील हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि कर्जमाफीवर बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील यांची अनोखी युती दिसून येत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे पूरामध्ये अगदी मुलांचे दप्तर सुद्धा वाहून गेले. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मी आंदोलनात आलो. आंदोलनावर सरकारने काल डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलो. षडयंत्राला आणि डावाला प्रतिडावानेच उत्तर द्यावे लागेल. शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकतो आहे. आंदोलन कसं करायचं याचे सल्ले मी देऊ शकत नाही. कारण त्यांचे आंदोलन वेगळे आहे. पण आंदोलनाचा मूळ गाभा हा आंदोलक असतो. आज बच्चू कडू यांची सरकारसोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर काय निर्णय होतो ते बघू, अशी भूमिका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

परसोडीच्या मैदानावर गैरव्यवस्था

बच्चू कडू यांनी देखील जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्याबद्दल भावना व्यक्त केल्या. मनोज जरांगे जरी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे असले, बहुतांशी वैदर्भीय शेतकरी ओबीसी असले, तरी आज जरांगे पाटील शेतकरी हितासाठी या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे इथे त्यांच्या येण्याला जातीच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही, म्हणून जरांगे पाटील यांचं आम्ही स्वागत करतो असेही बच्चू कडू म्हणाले. दरम्यान परसोडीच्या मैदानावर प्रशासनाने कुठलीच व्यवस्था केली नाही, प्रशासन नेहमीच आंदोलकांना आपला शत्रू समजतो त्यामुळेच परसोडीच्या मैदानावर गैरव्यवस्था झाली अशी नाराजी ही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ज्यांची सरकारी नोकरी आहे, पेन्शन आहे किंवा जे व्यापारी आहेत, ज्यांनी फक्त गुंतवणूक करण्यासाठी, टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतली आहे, अशा शेतकऱ्यांना मुळीच कर्जमाफी मिळू नये असे बच्चू कडू म्हणाले आहेत. डिजिटल इंडियामुळे प्रत्येकाची खरी आर्थिक स्थिती शोधणे सरकारला आता सोपे झाले आहे. त्यामुळे सरकारने गरजवंत शेतकरी लवकरात लवकर शोधावे आणि त्यांना कर्जमाफी द्यावी अशी अपेक्षाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

Web Title: Maratha leader manoj jarange patil with bacchu kadu shetkari andolan in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • Manoj Jarange
  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur: ‘भांडेवाडी’ पुन्हा पेटली, नागरिकांत भीतीचे वातावरण; ७ बंब घटनास्थळी दाखल
1

Nagpur: ‘भांडेवाडी’ पुन्हा पेटली, नागरिकांत भीतीचे वातावरण; ७ बंब घटनास्थळी दाखल

Nagpur Crime: ओडिशातून कारने गांजा तस्करी, भंडारा-नागपूर महामार्गावर चौघांना अटक; ५ किलो माल जप्त
2

Nagpur Crime: ओडिशातून कारने गांजा तस्करी, भंडारा-नागपूर महामार्गावर चौघांना अटक; ५ किलो माल जप्त

Nagpur महापालिकेला मिळणार ८२ कोटी रुपयांचे अनुदान; तब्बल 4 वर्षांनी…
3

Nagpur महापालिकेला मिळणार ८२ कोटी रुपयांचे अनुदान; तब्बल 4 वर्षांनी…

Nagpur Crime: नागपुरात अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार; बाळाच्या जन्मानंतर प्रकार उघड, 20 वर्षीय आरोपी अटकेत
4

Nagpur Crime: नागपुरात अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार; बाळाच्या जन्मानंतर प्रकार उघड, 20 वर्षीय आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.