Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS on Meat Banned : 15 ऑगस्टला KDMC हद्दीत मटन, चिकन, मच्छी विक्रीला बंदी…; मनसेची भूमिका काय?

15 ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कल्याण पालिकेने मांसाहारावर बंदी घातली आहे. यावर आता मनसे नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून तीव्र विरोध केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 13, 2025 | 04:44 PM
MNS on Meat banned in Maharashtra on 15 august independence day

MNS on Meat banned in Maharashtra on 15 august independence day

Follow Us
Close
Follow Us:

MNS on Meat Banned : मुंबई : यंदा देशामध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे  वातावरण आहे. त्याचबरोबर हर घर तिरंगा ही मोहीम देखील राबवली जात आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये नवा वाद उफाळून आला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदी घालण्यात आली आहे. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली असून ही काहींनी समर्थन देखील केले आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारची ही दडपशाही असल्याचे म्हणत टीका केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर मनसे पक्षाची भूमिका आता समोर आली आहे.

मनसे पक्ष हा सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवताना दिसला आहे. सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला देखील मनसे पक्ष आणि राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला. यानंतर आता 15 ऑगस्ट रोजी राज्यातील काही महापालिकांकडून मांस विक्रीची दुकाने आणि कत्तलखाना बंद करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्री करणाऱ्या दुकानांवर बंदी असल्याचे जाहीर केले. याविषयी सर्वप्रथम KDMC ने आदेश जारी करत 15 ऑगस्टच्या दिवशी मांस-मटण विक्रीवर बंदी असल्याचे जाहीर केले होते. इथून वादाची सुरुवात झाली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मनसे पदाधिकारी मनोज घरत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी चिकन आणि मच्छी विक्री बंदीवर भाष्य केले आहे. मनोज घरत म्हणाले की, पालिका आयुक्तांच्या अभिनव आदेशाला मनसेचा कडाडून विरोध आहे. आयुक्त काय अभिनव पोल्ट्री फार्म उघडणार आहेत का ? असा आयुक्तांना मनसेच्या नेत्यांनी संतप्त सवाल विचारला आहे.

मनसे पदाधिकारी मनोज घरत यांनी दहीहंडीबाबत सांगितले की, डोंबिवलीत मनसेची चार थरांची दहीहंडी लावण्यात येणार आहे. मराठी संस्कृती, सण आणि परंपरा जपणारी ही दहीहंडी असणार आहे. डोंबिवलीत चार रस्ता येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदा पथकांसाठी दहा लाखाची बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मनसे पदाधिकारी मनोज घरत यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत कोणताही प्राणी कत्तल करू नये किंवा मांस विक्री करू नये, असे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार कलम ३३४, ३३६ आणि ३७४ (अ) अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले आहे. या निर्णयामध्ये कल्याण डोंबिवली, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि जळगाव महानगर पालिकांचा समावेश आहे.

Web Title: Mns on meat banned in maharashtra on 15 august independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • KDMC
  • MNS
  • Mutton

संबंधित बातम्या

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪
1

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Dombivali MIDC : नाल्यात सोडलेल्या गुलाबी पाण्याचं प्रकरण काय ? व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड
2

Dombivali MIDC : नाल्यात सोडलेल्या गुलाबी पाण्याचं प्रकरण काय ? व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
3

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
4

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.