Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahakumbh Mela 2025 : राष्ट्रपती मुर्मूच्या अमृतस्नानासाठी 12 तास महाकुंभमेळा रोखला? विरोधी नेत्यांचा आक्रमक पवित्रा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराजमध्ये जाऊन त्रिवेणी संगमामध्ये अमृतस्नान केले. मात्र आता यावरुन राजकारण रंगले आहे. मुर्मू यांच्यामुळे 12 तास महाकुंभमेळा थांबवल्याचा आरोप केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 11, 2025 | 10:47 AM
MP Sanjay Raut alleges Mahakumbh Mela stopped for 12 hours for President Draupadi Murmu Amritsnana

MP Sanjay Raut alleges Mahakumbh Mela stopped for 12 hours for President Draupadi Murmu Amritsnana

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. मागील महिन्यापासून हा मेळा सुरु असून जगभरातून लोक या महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. कोट्यवधी भाविकांनी आणि नागा साधूंनी त्रिवेणी संगमामध्ये अमृतस्नान केले आहे. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील गंगेमध्ये स्नान केले आहे. मात्र मुर्मू यांच्या अमृतस्नानामुळे महाकुंभमेळा रोखण्यात आला होता असा गंभीर आरोप केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्हीआयपी अमृतस्नानावरुन योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या त्रिवेणी संगमावरील अमृतस्नानावर आक्षेप घेत यामुळे चार कोटी भाविकांना संगमावर जाऊ दिले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाकुंभात स्नान करण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू आल्यानंतर कुंभमेळा इतरांसाठी थांबवण्यात आला. कोट्यवधी लोकांना रोड अ‍ॅरेस्ट करण्यासारखा प्रकार घडला आहे. त्यांना एक इंच पुढे जावू दिले नाही. सोमवारी राष्ट्रपतींच्या स्नानामुळे 12 तास महाकुंभमेळा रोखून धरला होता. त्रिवेणी संगमावर कोणाला जावू दिले नाही. तीन ते चार कोटी लोक तेथे होते,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “भाजपने कुंभमेळ्यात केलेल्या व्हीआयपी कल्चरचा फटका भाविकांना बसत आहे. दुसरीकडे विमान कंपन्या लूट करत आहेत. रेल्वेत जागा नाही. रिक्षावाले लूट करत आहे. हा काय कुंभमेळा आहे का?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे त्यांनी महाकुंभमेळ्यामध्ये प्रवाशांची व भाविकांची लूट सुरु असल्याचे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “प्रयागराजमध्ये भाविकांची लूट सुरु आहे. १५-१५ तास लोक रस्त्यावर उभे आहेत. रेल्वे आणि विमानात प्रवाशांना जागा मिळत नाही. तिकिटांचे दर प्रचंड वाढले आहे. जगभरातून हिंदूंना आमंत्रण दिले आहे. सोमवारी राष्ट्रपतींचे स्नान होते. त्यामुळे १२ तास कुंभमेळ्यातील स्नान रोखले होते. राष्ट्रपतींना स्नानासाठी १२ तास लागतात का? त्याकाळात भाविकांची प्रचंड झाले. कोट्यवधी लोक रस्त्यावर होते. कुंभमेळा हा राजकीय सोहळा करुन टाकला आहे. त्यामुळे हिंदूंचे सरकार निवडणाऱ्यांनी ही परिस्थिती पाहिल्यावर विचार करायला हवा,” अशा कडक शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या माजी मंत्री तानाजी सावंत आणि त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत हे चांगलेच चर्चेत आले आहेत. मुलगा ऋषिराज सावंत यांचे अपहरण केल्याची अफवा पसरली. यामुळे चर्चांना उधाण आले होते. यावर आता खासदार राऊतांनी तुफान टोलेबाजी केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात खंडणी, अपहरणाच्या घटना घडत आहेत. दुसरीकडे श्रीमंतांची मुले बँकॉकला पळून जाताय, ऋषिकेश खासगी विमानाने बँकॉककडे निघाला होता. शिवभोजन थाळी योजना सरकार बंद करत आहे. गरीबांच्या योजना बंद करत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठीही सरकार काहीच करत नाही. सरकारकडे शेतकऱ्यांसाठी ठोस योजना नाहीत. राज्यातील सोयाबीन उत्पादक हवालदील आहे,” अशा शब्दांत खासदार राऊत यांनी टीका केली आहे.

Web Title: Mp sanjay raut alleges mahakumbh mela stopped for 12 hours for president draupadi murmu amritsnana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • President draupadi murmu
  • sanjay raut
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
1

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
2

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
3

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार
4

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.