Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. यावर अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. याबाबत खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 09, 2025 | 12:30 PM
आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : दिल्लीमध्ये भाजपचा विजय झाला तर आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. 27 वर्षांनंतर भाजपला दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यामध्ये यश मिळाले आहे. यामुळे देशभरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून व नेत्यांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. मात्र यामध्ये कॉंग्रेसला एकही जागा मिळालेली नाही तर आपला 22 जागा मिळाल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झाला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. दिल्लीमध्ये झालेल्या पराभवाचे देखील त्यांनी विश्लेषण केले आहे. यावेळी त्यांनी आप व कॉंग्रेस पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढण्याची गरज होती अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, निवडणुकीत जय-पराजय होत असतात. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून निवडणुका लोकशाही पद्धतीने लढल्या जात नाहीत. निवडणुका सैतानी पद्धतीने लढल्या जात आहेत. आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी मग साम, दाम, दंड, भेद अशा सर्व गोष्टींचा वापर केला जातो. मतदार याद्यांमधील घोटाळा महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्याला दिल्लीत दिसतो आहे. उद्या बिहारमध्ये हेच दिसेल. असाच प्रकार हरियाणातही दिसला. पण आता या सर्वांचा बाऊ न करता पुढल्या लढाईसाठी विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे त्यांनी अण्णा हजारे यांना देखील निशाण्यावर धरले. खासदार संजय राऊत म्हणाले की, “अण्णा हजारे काय म्हणतात त्याला काही अर्थ राहिला नाही. ते अचानक जागे होतात. महाराष्ट्रात एवढा भ्रष्ट्राचार झाला, लोकशाहीवर हल्ले झाले तरीही अण्णा हजारे यांनी कधीही हालचाल केली नाही. मात्र, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अण्णा हजारे यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर मी काल आनंद पाहिला. हे लोकशाहीला मारक आहे. अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे अण्णा हजारे देशाला माहिती झाले. पण गेल्या 10 वर्षांत देशात अनेक संकटे आली, देश लुटला जात आहे. अनेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले ते आज सर्व भाजपाबरोबर आहेत. मग अण्णा हजारे यांना त्याबाबत मत व्यक्त करावं असं वाटत नाही का? त्यामागचं रहस्य काय आहे?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे,

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवाचा आनंद अण्णा हजारे किंवा काँग्रेसला झाला असेल तर याचं दु:ख वाटतं. कारण अरविंद केजरीवाल जरी निवडणूक हरले असले तरी भाजपा विजयी झालं आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढले असते तर आज निकाल वेगळा लागला असता हे आकड्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकत्र यायचं की नाही? याबाबत सर्वांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. यामुळे लोकशाही टिकेल का? विरोधी पक्षांचा आवाज राहिल का?” असे मत देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut target congress and anna hazare for delhi elections result 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Anna Hazare
  • Delhi Election Result
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप
1

Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश हे भाजपाचे कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक
2

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पडली वादाची ठिणगी? मनसे-शिवसेना वादावर संजय राऊतांचे सूचक विधान
3

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पडली वादाची ठिणगी? मनसे-शिवसेना वादावर संजय राऊतांचे सूचक विधान

१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!
4

१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.