Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पडली वादाची ठिणगी? मनसे-शिवसेना वादावर संजय राऊतांचे सूचक विधान

ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकीनंतर सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. स्वीकृत नगरसेवकांवरुन दोन्ही पक्षात वाद झाल्याचे चित्र आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 22, 2026 | 02:17 PM
शिर्डीत शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

शिर्डीत शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • राज उद्धव ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा
  • स्वीकृत नगरसेवकांवरुन वाद
  • संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य
Maharashtra Politics : मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित युतीची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा झाली. मात्र याचे रुपांतर मतांमध्ये करुन घेण्यात ठाकरे बंधूंना अपयश आले आहे. विशेषतः स्वीकृत नगरसेवकांच्या कोट्यातून मनसेला अपेक्षित असलेली जागा मिळालेली नाही. यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे (Thackeray Brothers Alliance) यांच्यात सध्या काहीच आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन आता ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडला असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंमधील युतीवर भाष्य केले. यावरुन दोन्ही बंधूंमध्ये निवडणुकीनंतर वादाची ठिणगी पडल्याचे दिसून आले. खासदार राऊत म्हणाले की, “महापालिकेचे राजकारण हे वेगळे असते आणि आमचे पक्षाचे काम वेगळे आहे. मी वैयक्तिकरित्या कधीही महापालिकेच्या राजकारणात किंवा या नियुक्तीच्या प्रक्रियेत पडलेलो नाही. महापालिकेत काय चालते हे सर्वांना माहित आहे, त्यामुळे आम्ही त्या तलावाच्या बाहेर राहणे पसंत करतो. मात्र, मनसे आणि आमची युती आजही टिकून आहे. या विषयावर अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेतृत्व घेईल,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

हे देखील वाचा : आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी ’! मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

पुढे ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेत तीन स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित करण्यात आली आहे. ही नावे प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहेत.” सूत्रांच्या माहितीनुसार, या जागांचे वाटप करताना मनसेला विश्वासात घेतले गेले नसल्याची प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली आहे. युती धर्म पाळून या ३ पैकी एक जागा मनसेच्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली होती. मात्र, ठाकरे गटाने आपल्याच नेत्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मनसेकडून कोत्या मनोवृत्तीची माणसं अशा शब्दांत टीका करण्यात आली आहे. यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

याचबरोबर काही दिवसांपूर्वी मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील राजकारणामध्ये काहीही कायमस्वरुपी काहीही नसतं या आशयाची टीका केली होती. राज ठाकरे म्हणाले होते की, आजची महाराष्ट्रातील जी सर्व परिस्थिती आहे. महाराष्ट्र हा सध्या आता आयसीयूमध्ये आहे. सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याला आपण बाळसं म्हणू शकत नाही. त्याला आपण सूज म्हणू शकतो. ही इतकी विचित्र घाणेरडी सूज आहे की ज्यात अनेकांना असं वाटतं की जे काही सुरु आहे हे कायमस्वरुपी आहे. कायमस्वरुपी काहीही नसतं, असे सूचक वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनामध्ये नक्की काय सुरु आहे याची चर्चा सुरु झाली.

Web Title: Mp sanjay rauts reaction to the dispute within the thackeray brothers alliance maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • political news
  • sanjay raut
  • Thackeray Brothers Alliance

संबंधित बातम्या

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान
1

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
2

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला
3

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला

20 कोटींच्या ऑफरच्या दाव्यावर आमदार धीरज लिंगाडे यांची पहिली प्रतिक्रिया; ‘राऊतांचा दावा पूर्णपणे खोटा’
4

20 कोटींच्या ऑफरच्या दाव्यावर आमदार धीरज लिंगाडे यांची पहिली प्रतिक्रिया; ‘राऊतांचा दावा पूर्णपणे खोटा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.