Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसला मिरची लागण्याचे कारण काय? महाविकास आघाडी तुटल्यानंतर संजय राऊतांचा जोरदार घणाघात

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आता महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनी एकमेकांवर आरोप सुरु केले असून मित्रपक्षांवरच टीका केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 12, 2025 | 12:38 PM
काँग्रेसला मिरची लागण्याचे कारण काय? महाविकास आघाडी तुटल्यानंतर संजय राऊतांचा जोरदार घणाघात
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मित्रपक्षांवर आरोप करत आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आगामी निवडणूका या स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर कॉंग्रेस नेत्यांनी व शरद पवार गटाच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देखील दिले आहे. यावर माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महापालिका निवडणुका कशा लढवायच्या यावर वरिष्ठांशी बोलून ठरवू, असे मत कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा गायकवाड यांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी पक्षातील विभागप्रमुख, जिल्हाप्रमुखांशी चर्चा केली. या चर्चेवेळी अनेकांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली. तीच आम्ही बोलून दाखवली. दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेसच्या नेत्यांनी आमचे विधान व्यवस्थित ऐकायला हवे. ऐकण्याचीही सवय लावली पाहिजे. दुसऱ्याचे ऐकणे ही एक मोठी गोष्ट असते. मी एवढेच म्हणालो की, लोकसभेसाठी इंडिया आघाडी आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडी बनवली होती. पण स्थानिक स्वराज संस्थेत कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेणेकरून स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत होईल. यावर काँग्रेसला मिरची लागण्याचे कारण काय?” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

महाविकास आघाडी तुटली आहे का? असा सवाल माध्यमांनी संजय राऊत यांना विचारला. संजय राऊत म्हणाले की, “इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी फुटली, असे शिवसेना (ठाकरे) पक्ष किंवा मी म्हटलेले नाही. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीबाबत आम्ही एक भूमिका मांडत आहोत. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, तर महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती. स्थानिक स्वराज संस्थेसाठी ही आघाडी नव्हती. आम्ही भाजपामध्ये असतानाही स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर लढत होतो,” असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर मोक्का लावला आहे. यावरुन देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, “या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बोलतात कोणालाही सोडणार नाही पण मुख्य आरोपीला सोडलं आणि सगळ्यांना मोक्का लावला आहे. भाजपची राज्य करण्याची ही पद्धत आहे, मुख्य आकाला स्वतःकडे ठेवायचं आणि त्याच्या खालील लोकांवर कारवाई करायची. बीड, परभणीमध्ये जे घडलं आहे ते अत्यंत धोकादायक आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील कारण ते न्याय आणि सत्याची भाषा करतात पण गुन्हेगारांना त्यांनी खपवून घेतलं आहे. वाल्मिक कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे, अशांना खपवून घेतले आहे आणि लहान मासे कापले आहेत,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut target congress leader varsha gaikwad after breaking maha vikas aghadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…
1

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
2

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर थेट निशाणा, सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद
3

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर थेट निशाणा, सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

‘अंधारे आल्या अन् सेना गेली, वैफल्यातून पालकमंत्र्यांवर आरोप’ – आमदार देवेंद्र कोठे, सुषमा अंधारेंच्या टीकेला भाजपचा पलटवार
4

‘अंधारे आल्या अन् सेना गेली, वैफल्यातून पालकमंत्र्यांवर आरोप’ – आमदार देवेंद्र कोठे, सुषमा अंधारेंच्या टीकेला भाजपचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.