
Pune Politics, NCP Ajit Pawar, Vikram Kakade, Ramdas Gade, MLC Election, Sunetra Pawar, Sunil Tingre,
आज (1 जून) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पुण्यातून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरुन पुण्यात नाराजीनाट्याला सुरूवात झाली आहे. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीनंतर पक्षात नव्या बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. यात पुण्यातून पहिला राजीनामा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसबा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा रामदास पाटील यांनी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पुण्याच्या जागेसाठ माजी आमदार दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात आणि विलास लांडे यांच्या नवांची चर्चा होती. तसेच, अजित गव्हाणे, रणजित शिवतारे आणि दीपक मानकर यांनाही उमेदवारी मिळू शकते, असे बोलले जात होते. पण पक्षाकडून अनपेक्षित नावे चर्चेत आल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्याकडे पाठवला आहे. राजीनामाच्या पत्रात रामदास गाडे यांनी पक्षाच्या अनपेक्षित निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष वाढवण्यासाठी आपण गेली तीन दशके निष्ठेने काम केले, आर्थिक अडचणींचाही सामना केला. पण उमेदवारी देताा मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले गेले, अशी खंत गाडे यांनी व्यक्त केली.
तसेच २०१७ मध्ये पक्षाला धक्का देणाऱ्या आणि पक्षातील नगरसेवकांना भाजपमध्ये नेण्यासाठी मदत केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाला उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे महत्त्व कमी झाल्याची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
“पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची किंमत राहिली नसेल, तर अशा पदावर राहण्यात अर्थ नाही,” असे नमूद करत त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा सुपूर्द केला असून तो स्वीकारण्याची विनंती केली आहे. दरम्यान, उमेदवारीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नाराजी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.