नरहरी झिरवाळ यांच्या कथित आक्षपार्ह व्हिडिओ प्रकरणामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी फोनवर चर्चा केली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर, पक्षाची संपूर्ण निर्णय प्रक्रिया त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ यांच्या हाती आली आहे. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबच नाराजीचा सूर उमटत आहे.
विलीनीकरणाला संमती दर्शवतानाच सुनील तटकरे यांनी नेतृत्वाबाबत एक मोठी अट किंवा 'सुचक मागणी' समोर ठेवली आहे. "विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवार यांनच पक्षाचा मुख्य नेता म्हणून स्वीकारायला हवे.
या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत आता मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी काळात हे पद कोणाकडे सोपवले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने राजीनाम्याची मागणी केली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांंच्या अकाली निधनानंतर तालुक्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वावर अवलंबून असलेले कार्यकर्ते सध्या निराधार झाल्याचे चित्र आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे पाद्यपूजन केल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची देखील शक्यता आहे.
गेल्या चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे जिल्हा परिषदेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहेत. अध्यक्षपद आणि उपाध्यक्षांची निवड निश्चित झाली असली तरी त्यासाठी होणारी निवडणुकीची औपचरिकता मात्र होणार आहे.
बारामती विमान अपघातातील व्हीएसआर कंपनीबद्दल खुलासे होण्याची वाट पाहणाऱ्यांना खात्री होती की जय त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मीडियासमोर काही खळबळजनक खुलासे करू शकतात,
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.
दौंड तालुक्यात भाजपाचा आमदार असताना राष्ट्रवादीने सात पैकी सहा जागांवर विजय मिळविला. जिल्हा परिषद सभागृहात अनुभवी सदस्यांसह मातब्बर नेत्यांच्या वारसदारांनी प्रवेश केला आहे.
अजित पवारांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात असा संशय विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
सुनेत्रा पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षाची तातडीने बैठक बोलावली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच मोठी बैठक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता शिंदे यांनी टिप्पणी टाळली. त्यांची भूमिका त्यांनीच मांडावी. आम्ही पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत,
सुनील तटकरे यांनी सांगितले की, शरद पवार गटाकडून अद्याप विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अधिकृत प्रस्ताव आल्यास पक्ष त्यावर विचार करेल, असे ते म्हणाले.
अटक करण्यात आलेल्या लिपिकाने चौकशीदरम्यान दावा केला आहे की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती