Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Rahul Gandhi : इंदूरमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत राहण्याचं आवाहन केलं. पेपरफुटी, बेरोजगारी, सरकारी भरती आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्यांवरही विद्यार्थ्यांनी सवाल उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Sep 19, 2026 | 09:23 PM
Rahul Gandhi

Rahul Gandhi

Follow Us
Follow Us:
  • ‘सिस्टीमला विद्यार्थी नकोत, अंधभक्त हवेत’, राहुल गांधींचं वक्तव्य
  • पेपरफुटी आणि बेरोजगारीवर विद्यार्थ्यांनी मांडले सवाल
  • सरकारी भरती, वसतिगृह आणि आदिवासी भागातील समस्यांचाही मुद्दा
 

Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंदूरमध्ये आयोजित ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची सवय कायम ठेवावी, असं आवाहन केलं. ‘सिस्टीमला विद्यार्थी नकोत, अंधभक्त हवेत’, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं.

विद्यार्थी जिज्ञासू असतात आणि प्रत्येक गोष्ट सांगितली म्हणून लगेच स्वीकारत नाहीत. एखादी गोष्ट का घडते, त्यामागचं कारण काय आहे, हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळेच विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि यंत्रणेला अशा प्रश्नांची भीती वाटते, असं राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासह इतर संस्थांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. संस्था योग्य पद्धतीने काम करत आहेत का, हे विद्यार्थ्यांनी विचारलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी कोणतीही गोष्ट डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी त्यावर विचार करावा आणि आपली भूमिका मांडावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात

राहुल गांधी यांनी ‘अंधभक्त’ या शब्दाचा वापर करत प्रश्न न विचारता प्रत्येक गोष्ट स्वीकारणाऱ्या मानसिकतेवर भाष्य केलं. विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रेम, आदर आणि विनम्रतेशी जोडत त्यांनी विद्यार्थी दुसऱ्यांचं ऐकतात, प्रश्न विचारतात आणि आपली बाजू मांडतात, असं सांगितलं. याचवेळी त्यांनी द्वेष, अहंकार आणि भीतीचाही उल्लेख केला.

पेपरफुटी आणि बेरोजगारीचा मुद्दा

विद्यार्थ्यांच्या समस्यांवर बोलताना राहुल गांधी यांनी पेपरफुटी आणि बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. शाळा आणि महाविद्यालयांची परिस्थिती कशी आहे, पेपर का फुटतात आणि तरुणांना रोजगार का मिळत नाही, असे प्रश्न विद्यार्थी विचारतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची बाजू ऐकली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.

विद्यार्थ्यांनी मांडल्या समस्या

‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपापल्या समस्या राहुल गांधींसमोर मांडल्या. आदिवासी भागातील आरोग्य सुविधा, वनपट्टे, रिक्त पदे आणि सरकारी वसतिगृहांची स्थिती यासारखे मुद्दे विद्यार्थ्यांनी मांडले.

समस्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याचा दावा एका विद्यार्थ्याने केला. सरकारी भरती आणि पेपरफुटीचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. नोकरभरतीसंदर्भात प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होतात आणि तुरुंगात जावं लागतं, असा दावा काही विद्यार्थ्यांनी केला.

एका विद्यार्थ्याने विद्यापीठातील प्रवेश आणि परीक्षांशी संबंधित समस्याही मांडल्या. गुणवत्ता असूनही मास्टर्स अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नसल्याची तक्रार त्याने केली. त्यामुळे शिक्षण, रोजगार आणि सरकारी भरतीशी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न या कार्यक्रमात केंद्रस्थानी राहिले.

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

Web Title: Rahul gandhi students ki goonj indore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Congress
  • Rahul Gandhi
  • Students

संबंधित बातम्या

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
1

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन
2

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन

NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज
3

NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
4

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.