
Sanjay Raut slams Mahayuti Government, financial dealing in Vidhan Parishad Election, Vidhan Parishad Election, Mahayuti Government,
संजय राऊत यांनी आज (मंगळवार, १९ मे) माध्यमाशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, “सध्या पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर त्यांनी देशवासीयांवर आर्थिक ताण टाकून हा दौरा केला आहे. भारतीय जनता पक्ष हा जमिनीवरचा पक्ष नाही. भाजपची सरकार हि गैरमार्गाने आलेली सरकार आहे. भाजप ज्यादिवशी फेअर निवडणुका घेईल तेव्हा त्यांना त्यांचं अस्तित्व समजेल. असं आणि प. बंगालमध्ये निवडणुकीत घोटाळे करून ते सत्तेवर आले आहेत. केरळच्या आणि तामिळनाडूच्या जनतेने त्यांना ते करून दिले नाही. जोपर्यंत जनता निर्भय होत नाही. तोपर्यंत जनतेला हा मार सहन करावा लागेल.,” असते ते म्हणाले.
NCP Politics: राष्ट्रवादीत नव्या चाणक्याची एन्ट्री ? सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी घेतली गुप्त भेट
अमेरिकेत अडाणी विरोधात असलेल्या खटल्यांबाबत ते पुढे म्हणाले, “अडाणी विरोधात अमेरिकेत खटले सुरु असताना मोदींनी थेट हस्तक्षेप करून ते काढून घेतले आहे. या खटल्यांमध्ये कोणती तडजोड झाली, हे फक्त मोदींना माहित आहे. पण देशाला अजूनही अनेक लोक खोट्या खटल्यांखाली तुरुंगात आहेत. अडाणीला जागतिक स्तरावर न्याय मिळाला, पण आमच्या किंवा सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही,” असे ते म्हणाले. या
वाढत्या महागाईबाबत बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले, “वाढती महागाई मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. या परिस्थितीमुळे आर्थिक अराजकता निर्माण होईल आणि सरकार मुस्लिम, पाकिस्तान किंवा इतर बाह्य घटकांवर लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करेल. पूर्वी महागाईविरोधात आंदोलने, महिला मोर्चे, विद्यार्थी रस्त्यावर उतरायचे आणि सरकारला जमतेच आवाज ऐकवायचे. परंतु सध्या असे आंदोलन करणे देशद्रोहाचा गुन्हा मानले जाते. आंदोलनकर्त्यांवर खोटी कलमे लावून त्यांना अटक केली जाते. त्यामुळे सामान्य लोक निष्प्रभ आणि असहाय्य राहतात. त्यामुळे आता सध्या लोकांकडे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. महागाईमुळे त्रास सहन करावा किंवा जय श्रीराम म्हणत शांत बसा,” असे उदगार त्यांनी काढले आहेत.