shivsena thackeray group leaders meet Governor c p radhakrishnan
Maharashtra Politics : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. नुकतेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले आहे. हे अधिवेशन विधेयक कामे आणि निर्णायमुळे न गाजता राजकीय नेत्यांच्या प्रतापांमुळे गाजले आहे. राज्यातील राजकीय अनेक राजकीय नेत्यांचे भांडणे, घोटाळे आणि मारहाण समोर आली आहे. याविरोधात आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. सकाळी 11.30 च्या सुमारास ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, नितीन नांदगावकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या शिलेंदारांनी राज्यपालांची अचानक भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील वाचाळवीर मंत्री आणि कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घेण्याबाबत त्यांनी हे पत्र लिहिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या भेटीची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. अंबादास दानवे यांनी लिहिले आहे की, “सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळांने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिले. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाबद्दल माहिती पत्राद्वारे दिली. मंत्री संजय शिरसाठ, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे , राज्य मंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्या गंभीर प्रकरणाची वस्तुस्थिती स्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडली,” अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण, ठाणे बोरिवली बोगदा प्रकरण, मीरा भाईंदर महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार अशा अनेक प्रकरण संदर्भात राज्यपाल यांना पत्राद्वारे माहिती दिली. यावेळी शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुष्माताई अंधारे, सुप्रदाताई फातप्रेकर, विशाखाताई राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, आमदार मिलिंद नार्वेकर, नितीन देशमुख, अनंत नर व महेश सावंत उपस्थित होते,” अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे.
सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळांने महामहीम राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांना आज पत्र दिले. राज्य… pic.twitter.com/JZHWoiXxZN — Ambadas Danve (@iambadasdanve) July 28, 2025