
Assembly Elections : केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण
नवी दिल्ली : दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता उर्वरित काही राज्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यात आसाम आणि केरळ या दोन राज्यांमध्ये आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
आसाममधील १२६, केरळमधील १४० आणि पुदुचेरीमधील ३० जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. आसाम विधानसभा निवडणुकीत एकूण ७२२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई, विरोधी पक्षनेते देबब्रता सैकिया, एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल, रायझर दलचे नेते अखिल गोगोई आणि एजेपीचे अध्यक्ष लुरिंज्योती गोगोई यांसारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये एकूण ३१४९० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत, जिथे सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत २५ दशलक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, ज्यामध्ये अंदाजे १२.५ दशलक्ष महिला आणि ३१८ दशलक्ष तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
मतदानाला सुरुवात
केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. केरळ, आसाम आणि पुदुचेरीमधील आगामी विधानसभा निवडणुका राजकीय पक्षांपेक्षा त्यांच्याशी संबंधित मोठ्या नावांची कसोटी ठरू शकतात. केरळमधील पिनारयी विजयन, आसाममधील हिमंता बिस्वा सरमा आणि पुदुचेरीमधील एन. रंगस्वामी यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, निवडणुकीच्या निकालांचे दूरगामी राजकीय परिणामही होतील.
तामिळनाडूत रामचंद्रन यांच्या नावाचा दबदबा
एआयएडीएमकेचे दिग्गज नेते एम. जी. रामचंद्रन यांच्या नावाचा उल्लेख केल्याने राजकीय पक्षांना मते मिळतात, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. एमजीआर यांच्या निधनाला ४० वर्षे उलटूनही, तामिळनाडूतील राजकीय पक्षांना असे वाटते की त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याने निवडणुकीत यश मिळेल.
काँग्रेस अध्यक्ष त्यांच्या विधानामुळे चर्चेत
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सध्या जोरदार चर्चेत आले आहेत. खरगे हे केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजराती समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. काँग्रेस (Congress News) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे मोदी सरकारसमोर झुकले असल्याची टीका आता राजकीय वर्तुळातून केली जात आहे.