
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये बरेच लोक कारच्या डॅशबोर्डवर देवांच्या मूर्त्या ठेवतात. गाडीत देवाची मूर्ती ठेवणे हे सकारात्मक ऊर्जा आणण्याचा तसेच सुरक्षित प्रवासाचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते. मात्र त्याच्या नियमांचे योग्य पालन करणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार आपल्या आराध्ये देवतेचे नामस्मरण, उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते तर ज्योतिषशास्त्रानुसार तर अशा काही मूर्त्या आहेत त्या ठेवणे अशुभ मानले जाते. कोणत्या देवतेची मूर्ती गाडीत ठेवणे शुभ अशुभ आहे ते जाणून घ्या
हिंदू धर्मात गाडीत देवाची मूर्ती ठेवणे हे धार्मिक श्रद्धेशी, तसेच वास्तु आणि मानसिक शांतीशी संबंधित असल्याचे मानले जाते. हिंदू संस्कृतीत प्रवासापूर्वी देवांचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. गाडी चालवणे हे प्रवासाशी जोडलेले आहे आणि म्हणूनच बहुतेक लोक नको असलेल्या गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी गाडीच्या डॅशबोर्डवर देवाची मूर्ती ठेवतात. गाडीमध्ये देवतांच्या मूर्ती ठेवल्याने प्रवास करताना प्रसन्न देखील वाटते, अशी त्यामागील धार्मिक श्रद्धा आहे.
वास्तुशास्त्रानुसार, सुरक्षितता आणि शुभकार्यासाठी गाडीत गणपती, हनुमान, दुर्गा आणि शिवाच्या आदियोगी रूपाच्या मूर्ती ठेवणे चांगले मानले जाते. गाडीच्या डॅशबोर्डवर गणपतीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते आणि ते संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. गणेशाला अडथळे दूर करणारे आणि प्रवासातील अडथळे दूर करणारे म्हणून ओळखले जाते. त्यासोबतच गाडीमध्ये हनुमानाची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. लांबच्या प्रवासाला निघताना हनुमानाचे स्मरण केल्याने सुरक्षित प्रवास होतो. याशिवाय, देवी दुर्गा आणि भगवान शंकर यांची मूर्ती त्यांच्या आदियोगी स्वरूपात ठेवणे देखील शुभ आहे.
तुमच्या गाडीत ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारची मूर्ती निवडणे महत्त्वाचे आहे. उघड्या डोळ्यांची मूर्ती नेहमीच निवडावी. ध्यानस्थ अवस्थेत असलेल्या देवतेचे चित्रण करणारी मूर्ती गाडीत ठेवू नये. कारण ध्यान करणाऱ्या व्यक्तीचे मन ध्यानातच राहते आणि ध्यान खंडित करणे शुभ मानले जात नाही. मूर्ती अशा प्रकारे ठेवावी की देवतेचे तोंड तुमच्याकडे असेल. यामुळे सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे नेहमीच वाहत राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हो, पण योग्य नियम पाळल्यास. चुकीच्या पद्धतीने ठेवलेली मूर्ती अशुभ मानली जाते.
Ans: श्री गणेश, हनुमान, दुर्गा माता किंवा बालकृष्ण यांच्या लहान मूर्ती शुभ मानल्या जातात. हे देव अडथळे दूर करतात आणि संरक्षण देतात, अशी मान्यता आहे.
Ans: देवतेला नमस्कार करून सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करावी. यामुळे मन शांत राहते आणि सकारात्मक भावना निर्माण होतात.