Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astrology: केळी आणि नारळ ही पवित्र फळे आहेत? पूजेदरम्यान का केला जातो या दोन्ही फळाचा समावेश

हिंदू धर्मामध्ये केळ आणि नारळाला पवित्र मानले जाते. देवाला केळी आणि नारळ अर्पण करण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. केळी आणि नारळ देवाला का अर्पण केली जातात, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 02, 2025 | 02:44 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू परंपरेनुसार, देव आणि मंदिर याला भक्ती आणि आदराचे प्रतीक मानले जाते. बऱ्याचदा लोक मंदिरात जाऊन नवस करतात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी केळी किंवा नारळ अर्पण केला जातो. मात्र, मंदिरात नारळ आणि केळी सर्वात जास्त का अर्पण केली जातात? इतर फळे बियाण्यांद्वारे पुनरुत्पादित होतात. जर बिया प्राणी, पक्षी किंवा मानवांनी खाल्ल्यानंतर पडल्या तर त्या बियाण्यापासून एक नवीन वनस्पती उगवते. म्हणून, फळांमध्ये भूतकाळातील जीवनाचे अवशेष, इतर जीवांचे अवशेष असू शकतात परंतु नारळ आणि केळी अशा प्रकारे पुनरुत्पादित होत नाहीत. ही अशी फळे आहेत ज्यात संपूर्ण ज्ञान आहे. म्हणूनच त्यांना पवित्र मानले जाते.

नारळाला आत्मसमर्पणाचे प्रतीक मानले जाते

असे म्हटले जाते की, नारळ फोडल्याने आपला अहंकार नष्ट होतो. त्याच्यावरील कठीण आवरण आपल्या अहंकाराचे प्रतिनिधित्व करते आणि ते फोडून आपण स्वतःला समर्पण करतो. जर आपण सांस्कृतिकदृष्ट्या पाहिले गेल्यास याचा पूजेत वापर करणे म्हणजे स्वतःला समर्पण करण्याचे लक्षण मानले जाते. त्यामधील आतले पांढरे खोबर हे आपल्या मनाचे प्रतिबिंब असते.

Vastu Tips For Rakhi: राखी बांधताना कोणत्या दिशेला बसणे योग्य, जाणून घ्या नियम

देवी लक्ष्मीला अर्पण केला जातो नारळ

नारळाला श्रीफळ असे देखील म्हटले जाते. धन, समृद्धी आणि संपत्तीची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नारळ अर्पण केले जाते. या फळाला तीन डोळे आहेत, जे त्रिनेत्र शिवाचे देखील प्रतीक मानले जाते. नारळाचे तीन डोळ्यामधील पहिले भूतकाळाचे प्रतिनिधित्व करतात, दुसरे वर्तमानाचे प्रतिनिधित्व करतात आणि तिसरे भविष्याचे प्रतिनिधित्व करतात. या तिन्ही डोळ्यांना शरीराचे प्रतीक मानले जाते. जे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर.

केळी हे त्यागाचे प्रतीक मानले जाते

नारळाव्यतिरिक्त केळं हे अतिशय खास असे फळ आहे. जर आपण केळ खावून त्याची साल फेकून दिल्यास त्यापासून कोणतेही नवीन रोप उगवत नाही. केळीच्या झाडाच्या देठापासून नवीन कोंब उगवतील. केळीचे झाड आयुष्यात फक्त एकदाच फळ देते. पण शेवटी ते मरते आणि त्यातून नवीन कोंब उगवतात. हे जीवनातील त्याग आणि सद्गुणाचे एक उत्तम उदाहरण मानले जाते.

Budh Grah Upay: बुध ग्रहाला बळकट करण्यासाठी करा वेलचीचा ‘हा’ उपाय, तुमच्या जीवनात होतील सकारात्मक बदल

केळीचा प्रत्येक भाग पवित्र मानला जातो

पौराणिक कथेनुसार, विष्णू आणि लक्ष्मी यांना केळीच्या झाडाची पूजा करणे आणि केळीचे फळ अर्पण करणे विशेषतः आवडते. लक्ष्मीपूजेत केळीच्या पानांचा आणि फळांचा वापर अत्यंत शुभ मानला जातो. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये केळी अर्पण केली जातात. तसेच केळीच्या झाडाच्या पानाचा देखील वापर केला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips why are bananas and coconuts used in puja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar: बुध राशीच्या संक्रमणामुळे तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Budh Gochar: बुध राशीच्या संक्रमणामुळे तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Margashirsha Amavasya: 19 की 20 नोव्हेंबर कधी आहे मार्गशीर्ष अमावस्या, राशीनुसार करा या गोष्टींचे दान
2

Margashirsha Amavasya: 19 की 20 नोव्हेंबर कधी आहे मार्गशीर्ष अमावस्या, राशीनुसार करा या गोष्टींचे दान

Yuti 2025: तूळ राशीत शुक्र-चंद्र करणार युती, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी
3

Yuti 2025: तूळ राशीत शुक्र-चंद्र करणार युती, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

Shani Margi 2025: शनि देव करणार परिवर्तन, या राशीच्या लोकांच्या जीवनात येणार सुख समृद्धी
4

Shani Margi 2025: शनि देव करणार परिवर्तन, या राशीच्या लोकांच्या जीवनात येणार सुख समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.