
फोटो सौजन्य- pinterest
भारतीय घरामध्ये उंबरठा ही केवळ दाराची चौकट नसून, तो संस्कृती आणि श्रद्धेचा एक महत्वाचा भाग मानला जातो. अनेक घरांमध्ये आजही उबरक्यावर उभे राहू नये किया बसू नये असे सांगितले जाते. ही केवळ परंपरा नसून त्यामागे धार्मिक, वास्तुशास्त्रीय आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित काही ठोस कारणेही दडलेली आहेत.
सनातन धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला किंवा दाराच्या चौकटीला विशेष महत्त्व आहे. ते केवळ घराचे प्रवेशद्वारच नाही, तर समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीकही मानले जाते. वास्तुशास्त्रज्ञांच्या मते, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होण्यासाठी उंबरठा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवणे आवश्यक आहे. घराच्या उंबरठ्यावर उभे राहून काही गोष्टी करण्याचे टाळावे नाहीतर त्याचा परिणाम घरातील सदस्यांच्या शांतता, समृद्धी आणि वागणुकीवर होऊ शकतो. घराच्या उंबरठ्यावर उभे असताना कोणत्या चुका करू नये, जाणून घ्या
उंबरठा हा घराच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. असे मानले जाते की, याच मागर्गाने लक्ष्मीचे घरात आगमन होते. त्यामुळे उंबरठ्यावर उभे राहणे किंवा त्यावर पाय ठेवणे हे अशुभ मानले जाते. तसेच, उंबरठा हा घरातील आणि बाहेरील ऊर्जेमधील सीमारेषा समजला जातो. त्यावर थांबल्यास बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात येऊ शकते, असा समज आहे. म्हणूनच पारंपरिक पद्धतीत उंबरठा ओलांडूनच घरात प्रवेश करण्याची सवय लावली जाते. यामुळे घरात सकारात्मकता आणि शांतता टिकून राहते, अशी धारणा आहे.
पूर्वीच्या काळात घरांचे दरवाजे लहान आणि उंचीने कमी असायचे, त्यामुळे उंबरठ्यावर उभे राहिल्यास डोके लागण्याचा धोका असे. तसेच, दारात थांबल्यास बाहेरची धूळ, माती आणि गरम हवा थेट घरात येण्याची शक्यता वाढते. याशिवाय, सतत उंबरठ्यावर उभे राहणे हे येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी अडथळा ठरू शकते. म्हणूनच, उंबरठ्यावर न थांबता तो सहज ओलांडणे ही केवळ परंपरा नाही, तर घरात स्वच्छता, सुरक्षितता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्याची एक साधी आणि परिणामकारक सवय आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये घराच्या उंबरठ्यावर उभे राहणे किंवा बसणे अशुभ मानले जाते. यामागे धार्मिक समजुतींसोबतच अत्यंत व्यावहारिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. घराचा उंबरठा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार आणि घराची ‘लक्ष्मण रेषा’ मानला जातो. असे म्हटले जाते की, घराच्या उंबरठ्यावर उभे राहिल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते. तसेच उंबरठ्यावर उबे राहिल्याने लक्ष्मी घरात प्रवेश करण्यापासून रोखली जाते.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: भारतीय परंपरेनुसार उंबरठा हा घरातील आणि बाहेरील ऊर्जेच्या सीमारेषेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्याला धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व दिले जाते.
Ans: मान्यतेनुसार उंबरठ्यावर उभे राहिल्याने घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अडतो आणि नकारात्मकता वाढू शकते.
Ans: वास्तुशास्त्रानुसार उंबरठा घराचे संरक्षण करणारा भाग मानला जातो, जो नकारात्मक ऊर्जा घरात येण्यापासून रोखतो.