फोटो सौजन्य- pinterest
चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कन्यापूजनानंतर उपवास केला जातो. असे मानले जाते की, कन्यापूजना व्यतिरिक्त नवरात्रीचे फळ अपूर्ण मानले जाते. काही जण अष्टमी तर काहीजण नवमीला कन्यापूजन अवश्य करतात. कन्यापूजन करतेवेळी छोट्या मुलींना जेवणासोबत दक्षिणा देण्याची परंपरा आहे. श्रद्धेनुसार अन्न दक्षिणासोबत इतर वस्तू भेट देणे उत्तम मानले जाते. कन्यापूजनादरम्यान काय दान करावे ते जाणून घ्या
अष्टमी तिथी किंवा नवमी तिथीला ज्या दिवशी कन्या पूजन करणार आहात त्या दिवशी कन्यांना देवीचे रूप मानून श्रृंगाराचे सामान जसे की बांगड्या, टिकली, लिपस्टिक इत्यादी साहित्य भेट देऊ शकता. जर विवाहमध्ये अडथळे येत असल्यास हा उपाय करता येऊ शकतो. असे केल्याने विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होतील. याशिवाय नवमी तिथीच्या वेळी सवाशिणीला श्रृंगाराच्या वस्तू भेट द्या. असे केल्याने शुभ प्राप्ती होते.
कन्या पूजनामध्ये कन्यांना धनाचे दान करा. असे मानले जाते की अष्टमी किंवा नवमी तिथीला पाच सात किंवा नऊ मुलींना जेवणासोबत धनाचे दान देखील करावे. असे केल्याने आर्थिक समस्यातून सुटका होऊ शकते आणि घरामध्ये उत्पन्नाचे स्रोत वाढतील. सर्वात शेवटी कन्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते.
अष्टमी किंवा नवनीतिथीला कन्यांना नक्कीच फळ भेट द्या. यासाठी केळ, डाळिंब, सफरचंद इतर फळ भेट देऊ शकता. असे म्हटले जाते की घरातील एखाद्याचे आरोग्य बिघडले असल्यास हा उपाय केल्याने फायदा होऊ शकतो. असे जीवनात येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. शास्त्रामध्ये अन्न धन आणि फळांचे दान करणे उत्तम मानले जाते.
जर कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती कमकुवत असल्यास कन्या पूजनामध्ये कन्यांना खीर देऊ शकता. पाण्याचा संबंध चंद्राशी आहे. त्यासोबतच मानसिक समस्या आणि तणाव यांसारख्या समस्येपासून आराम मिळतो. पनवे वस्तूंचा संबंध चंद्रासोबत शुक्र ग्रहाची देखील आहे. याप्रकारे बुध ग्रहाची स्थिती कमकुवत असल्यास कन्यांना अभ्यासाशी संबंधित वस्तू म्हणजेच वही पेन इत्यादींचे दान करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कन्यापूजन हा चैत्र नवरात्रीचा महत्वाचा भाग आहे. हा सण अष्टमी किंवा नवमी दिवशी केला जातो. या दिवशी भगवतीच्या रूपात कन्यांना पवित्र मानून पूजा, अन्न आणि वस्तू देतात.
Ans: जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक आणि वैयक्तिक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते, पापमोचन होते आणि सुख-शांती मिळते
Ans: इच्छेप्रमाणे उपवास करता येतो. उपवास करून दान केल्यास अधिक पुण्य मिळते






