फोटो सौजन्य-pinterest
स्वप्ने पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु विशेष दिवशी किंवा सणांच्या दिवशी पडणारी स्वप्ने शुभ किंवा अशुभ घटनांचे संकेत असू शकतात. स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो, जो भविष्यातील घटना दर्शवतो. पंचांगानुसार, 19 मार्च रोजी सुरू झालेला चैत्र नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. बरोबर नऊ दिवसांनी म्हणजे २७ मार्च रोजी चैत्र नवरात्रीची सांगता होईल.
या काळात तुम्हाला स्वप्नात काही विशिष्ट गोष्टी दिसल्यास, ते देवी दुर्गेचे संकेत असू शकतात. स्वप्नशास्त्रानुसार चैत्र नवरात्रीतील स्वप्नांच्या शुभ आणि अशुभ घटना कोणत्या आहेत त्या जाणून घ्या
स्वप्नशास्त्रानुसार, चैत्र नवरात्रीमध्ये माता दुर्गेचे प्रसन्न रूप, एक लहान मुलगी, अखंड ज्योत, लग्नाच्या वस्तू, मोराची पिसे, मंदिर, शंख, घागर, सिंह, उमललेली लाल फुले, मंदिराची घंटा, वाहणारे पाणी, त्रिशूळ, पूजेचे पात्र, धार्मिक चिन्हे, फुलांचा हार, पैसा, नारळ, गंगाजल आणि जळणारा धूप पाहणे शुभ मानले जाते. या गोष्टी दिसणे हे तुमच्या जीवनात आनंद येणार असल्याचे लक्षण मानले जाते. देवी दुर्गा तुमच्या इच्छा देखील पूर्ण करू शकते.
जर चैत्र नवरात्रीदरम्यान तुम्हाला स्वप्नात अंधार, ओसाड मंदिर, देवी दुर्गेचे क्रोधित रूप, गढूळ पाणी, भांडणारी माणसे, चिखल, वाटेत आडवे येणारे रागावलेले मांजर, वाळलेली फुले, दुःखी वाटणे, कापलेले केस, स्वतःला इजा करणे, प्राणघातक शस्त्र, रागावलेला प्राणी, आग, फुटलेली काच, कोरडी विहीर आणि बंद दरवाजा दिसणे स्वप्नात अशा काही गोष्टी हे अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी भयंकर घडणार असल्याचे संकेत मानले जाते. तुमच्याकडून अशी चूक झाली आहे ज्यामुळे आदिशक्ती क्रोधित झाली आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही देवी दुर्गेची पूजा करावी आणि तुमच्याकडून जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या कोणत्याही चुकांबद्दल तिची माफी मागावी.
चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्याही वेळी शुभ स्वप्ने पाहणे हे शुभ मानले जात असले तरी, पहाटे ३ ते सकाळी ८ च्या दरम्यान पाहिलेली स्वप्ने खरी होण्याची शक्यता अधिक असते. असे मानले जाते की सकाळी मन शांत आणि आत्म्याच्या जवळ असते, ज्यामुळे त्या वेळी पडलेली स्वप्ने खरी होण्याची शक्यता अधिक असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नवरात्री हा देवी उपासनेचा अत्यंत पवित्र काळ आहे. या काळात मन अधिक एकाग्र आणि शुद्ध असते, त्यामुळे स्वप्नेही अधिक प्रभावी आणि संकेत देणारी मानली जातात.
Ans: वारंवार एकच स्वप्न दिसणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्याचा संकेत असू शकतो.
Ans: स्वप्ने हे केवळ संकेत असतात. त्यावर पूर्णपणे अवलंबून न राहता, योग्य कृती आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे






