Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Paunima 2025 : गुरुपैर्णिमेला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण का करतात ?

नवनाथ संप्रदायात देखील गुरु पौर्णिमेला महत्वाचं स्थान दिलं जातं. ह्याच दिवशी अनेक भक्त 'स्वामी समर्थांचे जीवनचरित्र - 'स्वामीचरित्र सारामृत' याचे पारायण करतात. यामागचं धार्मिक कारण काय ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 09, 2025 | 04:06 PM
Guru Paunima 2025 : गुरुपैर्णिमेला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण का करतात ?
Follow Us
Close
Follow Us:

गुरु पौैर्णिमा हा सण हिंदू धर्माच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. गुरु आणि शिष्याचा नात्याचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु कुठल्याही रुपात येऊन आपल्य़ाला मार्गदर्शन करतो. त्यामुळे गुरु आणि शिष्य याचं याचं असं आहे की त्याला कोणत्याही वयाचं बंधन नाही. नवनाथ संप्रदायात देखील गुरु पौर्णिमेला महत्वाचं स्थान दिलं जातं. ह्याच दिवशी अनेक भक्त ‘स्वामी समर्थांचे जीवनचरित्र – ‘स्वामीचरित्र सारामृत’ याचे पारायण करतात. यामागचं धार्मिक कारण काय ते जाणून घेऊयात.

स्वामी समर्थांना श्री गुरुदेवदत्त यांचे अवतार मानलं जातं. स्वामींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक भक्तांना योग्य दिशा दाखवली आहे. याचं स्वामीनिष्ठेपोटी अनेक स्वामीचरित्राचं गुरुपौैर्णिमेच्या दिवशी पारायण करतात. स्वामींच्या कार्यकाळापासून ते आजतागायत अनेक पिढ्यांनी भटकेल्या आयुष्याला मार्ग मिळावा यासाठी स्वामींना आपलं गुरु केलं. त्यामुळे अनेक जण स्वामींच्या चरित्राचं गुरुपौेणिमेला पारायण करतात.

या दिवशी अनेक भक्त ‘स्वामी समर्थ महाराज’ यांचे ‘स्वामीचरित्र सारामृत’ हे ग्रंथ पारायण करतात. या पारायणामागे केवळ धार्मिक परंपरा नाही, तर त्यामागे अनेक आध्यात्मिक कारण देखील आहे. स्वामी समर्थ हे दत्तगुरुंचे अंश आहेत. त्यामुळे या ग्रंथात केवळ स्वामींच्या जीवनचरित्राची माहिती नसते, तर तो श्रद्धा, भक्ती, शरणागती आणि गुरुकृपेचे दिव्य दर्शन घडवतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ग्रंथाचे पारायण केल्याने स्वामींच्या चरणी आपली निष्ठा दृढ होते. मनात शांती निर्माण होते, आत्मिक उन्नतीसाठी प्रेरणा मिळते आणि स्वामींच्या कृपाशीर्वादाची अनुभूती होते.स्वामी त्यांच्या भक्तांना इतकंच सांगतात की, विश्वास अढळ आणि संयम ठेव मी कायमच तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी त्यांच्या भक्तांना सांगतात.

का करतात गुरु पौर्णिमेला पारायण ?

गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मशुद्धी आणि गुरुकृपेच्या स्मरणाचा दिवस. स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे भक्तांसाठी गुरुच आहे. जीवनात आलेल्या अडचणी, संकटे, दुःख, शोक आणि मोहाच्या अंध:कारातून भक्तांना स्वामी या सारामृताच्या मदतीने प्रतिकुल परिस्थितीतून बाहेर काढतात, असा स्वामी भक्तांचा विश्वास आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामीभक्त एकत्रित सामूहिक पारायण करतात. हा ग्रंथ फक्त वाचनापुरता नाही, तर जीवनाचा सार आहे. पारायण म्हणजे केवळ ग्रंथ वाचणे नव्हे, तर त्यात दिलेल्या गोष्टी मन:पूर्वक आत्मसात करणे. त्यातून मिळणारे विचार, तत्त्वज्ञान आणि कृपाप्रसंग हे जीवनाला योग्य दिशा देतात.गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे पारायण केल्यास गुरुंच्या कृपेचा लाभ होतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

Web Title: Guru paunima 2025 why is swamicharita saramrita recited on guru paunima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Guru Purnima
  • Marathi News
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही
1

Ahilyanagar News: रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या
2

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या

Wardha News : “वर्धा जिल्ह्यासाठी 100 कोटींच्या वर निधी; विकासाला गती देणार” – डॉ. पंकज भोयर
3

Wardha News : “वर्धा जिल्ह्यासाठी 100 कोटींच्या वर निधी; विकासाला गती देणार” – डॉ. पंकज भोयर

कोकणात स्टार्टअप आणि नवोपक्रमांना आर्थिक पाठबळ, ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला मंजुरी; सरकारकडून 2.5 कोटींचा निधी
4

कोकणात स्टार्टअप आणि नवोपक्रमांना आर्थिक पाठबळ, ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला मंजुरी; सरकारकडून 2.5 कोटींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.