Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Jayanti 2026: वाल्मिकी रामायणामध्ये सुंदरकांडातील थरारक आणि प्रेरणादायी कथा

रामायणामधील सुंदरकांड हा सर्वांत प्रेरणादायी आणि अद्भुत अध्याय मानला जातो. या कांडामध्ये हनुमान यांच्या पराक्रम, बुद्धिमत्ता आणि अखंड रामभक्तीचे अप्रतिम चित्रण आढळते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 01, 2026 | 12:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वाल्मिकी रामायणामध्ये सुंदरकांडातील प्रेरणादायी कथा
  • कांड या नावाने ओळख
  • एकूण किती कांंड आहेत
 

सुंदरकांड हे वाल्मिकी रामायणातील पाचवे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय आहे, जे मुख्यत्वे हनुमानाच्या शौर्य, बुद्धिमत्ता, भक्ती आणि पराक्रमाचे वर्णन करते. यात हनुमान समुद्र ओलांडून लंकेत सीतेचा शोध घेणे, अशोक वनात सीतेला भेटणे, लंकादहन करणे आणि प्रभू रामाकडे परत येणे या विजयी मोहिमेचे वर्णन आहे.

रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य आहे. रामायणामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, सुग्रीव, अंगद, मेघनाद, विभीषण, कुंभकर्ण आणि रावण या पात्रांचा समावेश आहे. रामायणाची कथा ही त्याग आणि समर्पणावर आधारित आहे. रामाचे भावांशी, मित्रांशी असलेले नाते याचे सुंदर चित्रण वाल्मिकींनी केले आहे. सीतेचे अपहरण आणि त्यानंतर रामाकडून रावणाचा वध कसा करण्यात आला यावरही रामायण आधारित आहे. रामायण हे श्लोक म्हणजेच कांडमध्ये विभागले गेले आहे. यातील सुंदरकांड हे जणू हनुमानंतालाच समर्पित केले आहे.

कांड या नावाने ओळख

रामायणामध्ये एकूण 24 हजार श्लोक असून ते सात कांडांमध्ये विभागले गेले आहेत. रामायणाच्या या अध्यायांना कांड या नावानेही ओळखले जाते. या सात कांडांमध्ये रामाच्या जन्मापासून ते अवतार समाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडात विभागले आहे. सात कांडांमध्ये बाल कांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंधा कांड, सुंदर कांड, युद्ध कांड, उत्तर कांड यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील शक्ती आणि श्रद्धेचे केंद्र, कोणत्या ठिकाणी आहेत मारुतीस्थाने जाणून घ्या

सुंदर कांड हे असे एकमेव कांड आहे ज्यात मुख्य पात्र श्रीराम नसून हनुमान आहेत. या कांडात हनुमानाचे साहस, शौर्य आणि त्याचा निस्वार्थीपणा, शक्ती आणि रामाप्रतीची भक्ती सांगण्यात आली आहे. माता अंजनी हनुमानास लाडाने सुंदर संबोधत असे आणि ऋषी वाल्मिकींनी हेच नाव निवडले. या कांडात हनुमानाचा लंकेत पोहोचण्यापर्यंतचा प्रवास सांगण्यात आला आहे.

सुंदरकांड का नाव ठेवले असेल

सीता संशोधन कार्य रामाने जितक्या विश्वासाने हनुमान सोपविले होते. तितक्याच विश्वासाने ते काम त्याने केले. सुंदरकांड हे हनुमानाच्या लिलानेच भरलेले आहे. प्रत्येक कांडाला सार्थ नाव दिलेले आहे. बालकांड, अरण्यकांड, आयोध्याकांड, किष्किंधाकांड, उत्तराकांड या प्रत्येक नावाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ आहे. परंतु सुंदरकांड असे नाव का ठेवले असेल? याचा अर्थ असा की, भगवंत भक्तीच्या लिला ईश्वराला सुंदर वाटल्या म्हणून त्यांचे नाव सुंदरकांड ठेवले आहे. रामाला भक्ताचे काम सुंदर वाटले, कर्तृत्वशक्ती सुंदर वाटली. त्याच्या लिला, धडपड, बुद्धीमता वैगरे गोष्टी सुंदर वाटल्या म्हणून महर्षी वाल्मिकींनी त्यांचे नाव सुंदरकांड ठेवले. ज्यांचे परमेश्वर चिंतन करतो अशा महापुरुषांपैकी हनुमान एक आहेत.

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीपूर्वी या वस्तू घरी आणल्याने वाढेल सुख समृद्धी

सुंदर कांड हे असे एकमेव कांड आहे ज्यात मुख्य पात्र श्रीराम नसून हनुमान आहेत. या कांडात हनुमानाचे साहस, शौर्य आणि त्याचा निस्वार्थीपणा, शक्ती आणि रामाप्रतीची भक्ती सांगण्यात आली आहे. माता अंजनी हनुमानास लाडाने सुंदर संबोधत असे आणि ऋषी वाल्मिकींनी हेच नाव निवडले. या कांडात हनुमानाचा लंकेत पोहोचण्यापर्यंतचा प्रवास सांगण्यात आला आहे.

थोडक्यात, सुंदरकांड हे हनुमानाच्या निस्वार्थी सेवाभावाचे, पराक्रमाचे आणि रामभक्तीचे महाकाव्य आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुंदरकांड नाव का पडले?

    Ans: हनुमानाच्या सुंदर कर्तृत्व, भक्ती आणि लीलांमुळे या कांडाला ‘सुंदरकांड’ असे नाव देण्यात आले.

  • Que: सुंदरकांडाचे महत्त्व काय आहे?

    Ans: . हे कांड भक्ती, धैर्य, आत्मविश्वास आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा देते.

  • Que: सुंदरकांड का विशेष मानले जाते?

    Ans: कारण हे कांड हनुमानाच्या अद्भुत कार्यांनी भरलेले असून भक्ती आणि शक्तीचा सर्वोत्तम संगम दर्शवते.

Web Title: Hanuman jayanti 2026 how did the name sundarkand come about the miraculous and inspiring power hidden in sundarkand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Hanuman Jayanti
  • Hanuman Puja
  • hindu religion

संबंधित बातम्या

Sant Kanhopatra: पंढरपूरच्या विठ्ठलभक्त संत कान्होपात्रा कोण होत्या? विठ्ठलभक्तीमध्ये लीन झालेल्या कान्होपात्रांची प्रेरणादायी कथा
1

Sant Kanhopatra: पंढरपूरच्या विठ्ठलभक्त संत कान्होपात्रा कोण होत्या? विठ्ठलभक्तीमध्ये लीन झालेल्या कान्होपात्रांची प्रेरणादायी कथा

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय
2

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय

Atma Parmatma: ही सृष्टी नक्की कोणाच्या तालावर? आत्मा आणि परमात्मा फरक काय
3

Atma Parmatma: ही सृष्टी नक्की कोणाच्या तालावर? आत्मा आणि परमात्मा फरक काय

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास
4

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.