
कधी तुम्हाला कुठल्या ज्योतिषाने सांगितलं आहे का की पत्रिकेत राहू केती खराब आहे ? राहू केतूचा प्रभाव म्हणजे आता आयुष्यात काहीतरी चुकीचं घडणार हा एक समज झालेला आहे. राहू केतू म्हणजे आता आपलं वाईट होणार असं प्रत्येकाला वाटतं. खूप जणं शनी आणि राहू केतूला घाबरतात. पण कधी विचार केलाय का हे राहू केतू निर्माण झाले तरी कसे ? यामागे देखील एक पुराणकथा आहे. काय आहे यामागील गोष्ट जाणून घेऊयात.
पुराकथेनुसार अशी दंतकथा सांगितली जाते, की समुद्रमंथानाच्या वेळी भगवान विष्णूंचा राग अनार झाला आणि त्यांनी एका राक्षसाला मारलं. समुद्र मंथनाची कथा सर्वांनाच माहित आहे. ज्यातून चौदा रत्ने आणि अमृत निघालं होतं. हे अमृत जो कोणी प्राशन करेन तो अमर होईल. खरंतर दानवांच्या विरोधात देव अधिक शक्तीशाली व्हावे यासाठी या अमृताचा घाट घातला होता. देैत्य जेव्हा धुमाकूळ घालत असायचे तेव्हा देवांनी दैत्यांचा वध केल्यानंतर दानवांचे गुरू शुक्राचार्य यांना संजिवनी विद्या प्राप्त असल्या कारणाने युद्धा मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करायचे. त्यामुळे देव कुळावरचं दिवसेंदिवस संकट वाढत जात होतं. अशावेळी काय करावं हे देवांना कळत नव्हतं त्यावेळी देव भगवान विष्णूंकडे सल्ला मागायला गेले. तेव्हा विष्णू देवांनी सांगितलं की, समुद्रमंथन करून अमृत मिळवायचं आणि दानवांवर विजय मिळवायचा.
या मंथनातून आलेल्या अमृतासाठी देव आणि दानव यांच्यात वाद झाले होते. हे अमृत जो कोणी प्राशन करेन त्यांना अमरत्व प्राप्त होईल अशी या अमृताची ख्याती होती. आपण देखील अमर व्हावं आणि देवांवर विजय मिळावावा या हेतूसाठी दानवांनी अमृत कलश पळवून नेला.. दानवांकडील अमृताचा कलश मिळवण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी रुप धारण केलं. या मोहिनी रुपाची भूरळ फक्त दानवांनाच नाही तर देवांनाही पडली. मोहिनी रुपावर भाळलेल्या दानवांनी मोहिनी जे आणि जसं सांगेल तसं ऐकलं. आणि मोठ्या हुशारीने विष्णूंनी अमृत कलश मिळवला. आता देवकुळात आनंद साजरा केला जात होता.
विष्णू स्वत: देवांना अमृत वाटत होते. या अमृताची वाटणी करताना एका राक्षसाने चंद्रदेवांचं रुप घेतलं. काही वेळाने या राक्षसाचं पितळ उघड झालं. चंद्रदेव आणि इतर देवगणांनी राक्षसाचा खरा चेहरा समोर आणला. त्याला अमृत प्राशन करण्यापासून परावृत्त केलं. मात्र तोवर फार उशीर झाला होता. त्या राक्षसाच्या पोटात अमृताचा एक थेंब गेला होता. विष्णूंना याचा राग अनावर झाला त्यानंतर त्यांनी या राक्षसाची मान आणि धड वेगळं केलं. पण त्याने अमृत प्राशन केलं असल्याने त्याला मरण येणार नव्हतं. या राक्षसाचं मुंडकं आणि धड वेगळं झालं त्याचवेळी निर्माण झाले ते राहू केतू.
या राक्षसाच्या मुंडकं म्हणजे राहू आणि धड म्हणजे केतू. बऱ्याचदा ज्योतिष असं सांगतात की, राहू केतूचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी भगवान विष्णूंची उपासना करा. ते याच कराणाने. कारण राहू केतू विष्णू देवाला घाबरतात.