Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rama Navami: रामायणात किती कांड आहेत? काय आहेत या कांडांची नावे, जाणून घ्या

महर्षी वाल्मीकींनी रचलेल्या मूळ रामायणात २४ हजार श्लोक आहेत. हे महाकाव्य सात कांडांमध्ये (अध्यायांमध्ये) विभागलेले असून, त्यात सुमारे ५०० सर्ग आहेत. या महान ग्रंथाला 'आदिकाव्य' असेही म्हटले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 26, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रामायणात किती कांड आहेत
  • रामायणातील कांड म्हणजे काय
  • कांडांची नावे काय आहेत
 

 

रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य आहे. रामायणामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, सुग्रीव, अंगद, मेघनाद, विभीषण, कुंभकर्ण आणि रावण या पात्रांचा समावेश आहे. रामायणाची कथा ही त्याग आणि समर्पणावर आधारित आहे. रामाचे भावांशी, मित्रांशी असलेले नाते याचे सुंदर चित्रण वाल्मिकीनी केले आहे. सीतेचे अपहरण आणि त्यानंतर रामाकडून रावणाचा वध कसा करण्यात आला यावरही रामायण आधारित आहे. रामायण हे श्लोक म्हणजेच कांडमध्ये विभागले गेले आहे. तर रामायणात एकूण किती कांड आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.

रामायणामध्ये एकूण 24 हजार श्लोक असून ते सात कांडांमध्ये विभागले गेले आहेत. रामायणाच्या या अध्यायांना कांड या नावानेही ओळखले जाते. या सात कांडांमध्ये रामाच्या जन्मापासून ते अवतार समाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडात विभागले आहे. सात कांडांमध्ये बाल कांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंधा कांड, सुंदर कांड, युद्ध कांड, उत्तर कांड यांचा समावेश आहे.

बाल कांड

रामायणातील पहिले कांड हे बालकांड आहे. यात रामाचा जन्म, रामाचे बालपण, राम वनवासात जाण्यापूर्वीचे अयोध्येतील दिवस यांचा कथाभाग देण्यात आला आहे. अयोध्या हे रामाचे जन्मस्थान मानले जाते.

Ramayana: आजही जिवंत आहेत श्रीरामांच्या आठवणी, वनवासातील श्रीरामांचा अद्भुत प्रवास जाणून घेऊया

अयोध्या कांड

रामायणातील दुसरे कांड हे अयोध्या कांड आहे. यात श्रीरामाच्या वनवासापासून ते श्रीराम भरतच्या भेटीपर्यंतचे घटनाक्रम देण्यात आले आहेत. कैकेयी भरताला राज्य मिळण्यासाठी श्रीरामांना वनवासात पाठवण्यासाठी रचलेले नाट्य. तर दशरथाचा पुत्रशोकाने मृत्यू होतो याचा घटनाक्रमांमध्ये समावेश आहे.

अरण्य कांड

रामायणातील तिसरे कांड हे अरण्य कांड आहे. यात वनवासातील रामाचे जीवन, सीतेचे अपहरण हा कथाभाग यामध्ये देण्यात आला आहे.

किष्किंधा कांड

रामायणातील चौथे कांड हे किष्किंधा कांड आहे. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर श्रीराम सीतेच्या शोधात राम किष्किंधेच्या वानर साम्राज्यात दाखल होतात. या वानर साम्राज्यात श्रीरामांना सुग्रीव, हनुमंत आदि भेटतात. वानरसैन्य सीतेस शोधण्यास कशाप्रकारे प्रारंभ करतात. यासर्वांना रामाचे मिळाले प्रेम याचे वर्णन आहे.

Rama Navami 2026: प्रभू रामांचा जन्म आणि त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट्य, जाणून घ्या

सुंदर कांड

रामायणातील पाचवे कांड हे सुंदर कांड आहे. या भागात हनुमानाचे रामायणातील योगदान विस्ताराने वर्णन करण्यात आले आहे. जेव्हा वानरसेना सीतेस शोधण्यास प्रारंभ करते तेव्हा हनुमान समुद्र लांधून लंकेत प्रवेश करतात. त्यानंतर लंकादहन घडवितात.

तसेच रावणाच्या राज्यातील अशोकवन येथे सीता असल्याचा निरोप रामास कळवितात याच्या सर्व माहितीचे या सुंदर कांडमध्ये वर्णन करण्यात आले आहे. हनुमानाचे आणखी एक नाव म्हणजे सुंदर. या नावावरून यास सुंदर कांड असे नाव पडले.

युद्ध कांड

रामायणातील सहावे कांड हे युद्ध कांड आहे. या भागामध्ये श्रीराम व रावण यांच्यामधील युद्ध, रावण वध त्यानंतर रामाचे सहपरिवार अयोध्येस पुनरागमन व श्रीरामाचा पट्टाभिषेक यांचे वर्णन आहे.

उत्तर कांड

रामायणातील सातवे कांड हे उत्तर कांड आहे. या भागामध्ये रामाने सीतेचा लोकनिंदेमुळे केलेला त्याग, लव-कुश यांचा जन्म, रामावतार समाप्ती यांचे वर्णन या उत्तर कांडमध्ये देण्यात आले आहे.

रामायणाचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे. गुढीपाडव्यापासून एक एक कांडांमधून रामायणातील कथा सांगितल्या जात असतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रामायणात एकूण किती कांड आहेत?

    Ans: रामायणामध्ये एकूण 7 कांड आहेत.

  • Que: रामायणात किती श्लोक आहेत?

    Ans: रामायणामध्ये सुमारे 24 हजार श्लोक आहेत.

  • Que: रामायणाचे महत्त्व काय आहे?

    Ans: धर्म आणि सत्याचे पालन, कर्तव्यनिष्ठा, आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देते

Web Title: In the epic ramayana there are 7 kandas each kanda represents a major phase in the life of lord rama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • ram navami
  • Ramayana

संबंधित बातम्या

Shukra Gochar: शुक्र करणार आश्लेषा नक्षत्रात संक्रमण, या राशींच्या लोकांनी राहावे सावध
1

Shukra Gochar: शुक्र करणार आश्लेषा नक्षत्रात संक्रमण, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

Chanakya Niti: या व्यक्तींच्या वादात पडणे टाळा; अन्यथा येऊ शकते पश्चात्तापाची वेळ
2

Chanakya Niti: या व्यक्तींच्या वादात पडणे टाळा; अन्यथा येऊ शकते पश्चात्तापाची वेळ

Shivlilamrut: शिवलीलामृताच्या चौथ्या अध्यायात काय आहे? जाणून घ्या पारायणाचे महत्त्व आणि पूजाविधी
3

Shivlilamrut: शिवलीलामृताच्या चौथ्या अध्यायात काय आहे? जाणून घ्या पारायणाचे महत्त्व आणि पूजाविधी

Lakshmi Narayan Raja Yoga: निर्जला एकादशीच्या दिवशी तयार होत आहे लक्ष्मी नारायण राजयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा
4

Lakshmi Narayan Raja Yoga: निर्जला एकादशीच्या दिवशी तयार होत आहे लक्ष्मी नारायण राजयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.