
फोटो सौजन्य- pinterest
रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य आहे. रामायणामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, सुग्रीव, अंगद, मेघनाद, विभीषण, कुंभकर्ण आणि रावण या पात्रांचा समावेश आहे. रामायणाची कथा ही त्याग आणि समर्पणावर आधारित आहे. रामाचे भावांशी, मित्रांशी असलेले नाते याचे सुंदर चित्रण वाल्मिकीनी केले आहे. सीतेचे अपहरण आणि त्यानंतर रामाकडून रावणाचा वध कसा करण्यात आला यावरही रामायण आधारित आहे. रामायण हे श्लोक म्हणजेच कांडमध्ये विभागले गेले आहे. तर रामायणात एकूण किती कांड आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.
रामायणामध्ये एकूण 24 हजार श्लोक असून ते सात कांडांमध्ये विभागले गेले आहेत. रामायणाच्या या अध्यायांना कांड या नावानेही ओळखले जाते. या सात कांडांमध्ये रामाच्या जन्मापासून ते अवतार समाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडात विभागले आहे. सात कांडांमध्ये बाल कांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंधा कांड, सुंदर कांड, युद्ध कांड, उत्तर कांड यांचा समावेश आहे.
रामायणातील पहिले कांड हे बालकांड आहे. यात रामाचा जन्म, रामाचे बालपण, राम वनवासात जाण्यापूर्वीचे अयोध्येतील दिवस यांचा कथाभाग देण्यात आला आहे. अयोध्या हे रामाचे जन्मस्थान मानले जाते.
रामायणातील दुसरे कांड हे अयोध्या कांड आहे. यात श्रीरामाच्या वनवासापासून ते श्रीराम भरतच्या भेटीपर्यंतचे घटनाक्रम देण्यात आले आहेत. कैकेयी भरताला राज्य मिळण्यासाठी श्रीरामांना वनवासात पाठवण्यासाठी रचलेले नाट्य. तर दशरथाचा पुत्रशोकाने मृत्यू होतो याचा घटनाक्रमांमध्ये समावेश आहे.
रामायणातील तिसरे कांड हे अरण्य कांड आहे. यात वनवासातील रामाचे जीवन, सीतेचे अपहरण हा कथाभाग यामध्ये देण्यात आला आहे.
रामायणातील चौथे कांड हे किष्किंधा कांड आहे. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर श्रीराम सीतेच्या शोधात राम किष्किंधेच्या वानर साम्राज्यात दाखल होतात. या वानर साम्राज्यात श्रीरामांना सुग्रीव, हनुमंत आदि भेटतात. वानरसैन्य सीतेस शोधण्यास कशाप्रकारे प्रारंभ करतात. यासर्वांना रामाचे मिळाले प्रेम याचे वर्णन आहे.
रामायणातील पाचवे कांड हे सुंदर कांड आहे. या भागात हनुमानाचे रामायणातील योगदान विस्ताराने वर्णन करण्यात आले आहे. जेव्हा वानरसेना सीतेस शोधण्यास प्रारंभ करते तेव्हा हनुमान समुद्र लांधून लंकेत प्रवेश करतात. त्यानंतर लंकादहन घडवितात.
तसेच रावणाच्या राज्यातील अशोकवन येथे सीता असल्याचा निरोप रामास कळवितात याच्या सर्व माहितीचे या सुंदर कांडमध्ये वर्णन करण्यात आले आहे. हनुमानाचे आणखी एक नाव म्हणजे सुंदर. या नावावरून यास सुंदर कांड असे नाव पडले.
रामायणातील सहावे कांड हे युद्ध कांड आहे. या भागामध्ये श्रीराम व रावण यांच्यामधील युद्ध, रावण वध त्यानंतर रामाचे सहपरिवार अयोध्येस पुनरागमन व श्रीरामाचा पट्टाभिषेक यांचे वर्णन आहे.
रामायणातील सातवे कांड हे उत्तर कांड आहे. या भागामध्ये रामाने सीतेचा लोकनिंदेमुळे केलेला त्याग, लव-कुश यांचा जन्म, रामावतार समाप्ती यांचे वर्णन या उत्तर कांडमध्ये देण्यात आले आहे.
रामायणाचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे. गुढीपाडव्यापासून एक एक कांडांमधून रामायणातील कथा सांगितल्या जात असतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: रामायणामध्ये एकूण 7 कांड आहेत.
Ans: रामायणामध्ये सुमारे 24 हजार श्लोक आहेत.
Ans: धर्म आणि सत्याचे पालन, कर्तव्यनिष्ठा, आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देते