फोटो सौजन्य- pinterest
रामनवमीचा सण हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी प्रभू राम यांचा जन्म झाला असे मानले जाते. यंदा रामनवमीचा उत्सव आज गुरुवार, दि. 26 मार्च रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. तसेच चैत्र नवरात्रीची सांगता रामनवमीला होते, ज्या दिवशी विशेष विधी आणि संस्कार केले जातात. काही जण या दिवशी उपवास देखील करतात. रामाला मर्यादा पुरुषोत्तम असे देखील म्हटले जाते. रामनवमी हा सण भक्तिभाव, धर्म आणि आदर्श जीवनाची प्रेरणा देणारा आहे. प्रभू राम यांच्या जन्म आणि जीवनाच्या उद्दिष्टाबाबत जाणून घेऊया
रामनवमी हा भगवान राम यांच्या जन्माचा पवित्र उत्सव आहे. हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरा केला जातो. संपूर्ण भारतात भक्तिभावाने आणि आनंदाने हा सण साजरा होतो. अयोध्येचे राजा दशरथ यांना बराच काळ मूलं नव्हतं त्यांनी यज्ञ केल्यानंतर त्यांना चार पूत्र झाले.
राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रूघ्न यांपैकी राम हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. त्यांचा मानव जन्म हा साधासुद्धा नव्हता कारण त्या काळात राक्षस राज द्रावण अत्यंत बलवान होता. त्याने कठोर असं तप करून ब्रम्हदेवांकडून वरदान मिळवलं होतं. त्यामुळे देव दानव त्याला मारू शकत नव्हते त्यामुळे तो अहंकारी झाला आणि पृथ्वीवरती अन्याय आणि अत्याचार करू लागला. देव आणि ऋषी त्यामुळे त्रस्त झाले त्यांनी भगवान विष्णूंकडे प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णूंनी मानव रुपात जन्म घेऊन रावणाचा नाश करण्याचा निर्णय घेतला. रामाचा जन्म म्हणजेच धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचा विजय होय.
रामनवमीच्या दिवशी राम मंदिरात जाऊन रामाची मनोभावे पूजा करा. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी रामरक्षाचे पठण करा. या दिवशी प्रभू रामांना पालक, फळ, पंचामृत आणि सुंठवडाचा प्रसाद दिला जातो. हे सगळे पदार्थ उष्णतेच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात. रामनवमीच्या दिवशी रामाचे स्मरण केल्यामुळे जीवनात सत्य, संयम आणि कर्तव्य पाळण्याची प्रेरणा मिळते. शिवाय घरात सुख शांती आणि सकारात्मकता येते. संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भगवान राम यांचा जन्म अधर्मावर धर्माचा विजय दर्शवण्यासाठी साजरी केली जाते.
Ans: मंदिरात पूजा आणि आरती, घरात रामरक्षा स्तोत्र किंवा रामायण वाचन, उपवास आणि दान
Ans: सत्य आणि धर्म पाळण्याचे महत्त्व, कर्तव्यनिष्ठा आणि संयम, आदर्श पुत्र, पती, राजा होण्याची प्रेरणा






