
फोटो सौजन्य- chatgpt
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभर भाविक मोठ्या भक्तिभावाने जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. या मंदिरातील एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे जोतिबाला मीठ आणि पीठ अर्पण करणे. लोकपरंपरेनुसार मीठ हे शुद्धता, संरक्षण आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पूर्वीच्या काळात मीठ अत्यंत मौल्यवान वस्तू मानली जात होती. जोतिबाच्या चरणी मीठ अर्पण केल्याने घरातील संकटे, नकारात्मक शक्ती आणि अडचणी दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मीठ पीठ अर्पण करण्याची काय आहे परंपरा जाणून घ्या
महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी येथे असलेला जोतिबा डोंगर हे प्रसिद्ध असं धार्मिक स्थळ मानलं जातं. येथील गुलालासोबत मीठ आणि पीठ माळण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेमागे धार्मिक श्रद्धा आणि लोकविश्वास जोडलेला आहे. अखेर हे जोतिबा डोंगरावर आले तेव्हा त्यांना जेवणासाठी अन्नाची आणि अन्नधान्याची आवश्यकता होती. त्यावेळी अन्नपूर्णा देवीने म्हणजे यमाई देवीने भक्तांच्या या संकटांत अन्नधान्याचा पुरवठा करून बगर केली होती तेव्हापासूनच देवीला मीठ पीठ म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे प्रतीक असलेल्या वस्तू वाहण्याची प्रथा सुरू झाली.
जोतिबाच्या दारात उतरण रचली जाते त्या उतरणीवरती मीठ पीठ वाहून जोडप देवीकडे प्रार्थना करतात. नवीन संसाराची सुरुवात तुझ्या दारातून करत आहोत त्यामुळे आमचा संसार मीठ आणि पिठासारखा सुखाचा होऊ दे, अशी प्रार्थना केली जाते. म्हणूनच ही प्रथा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
लोकमान्यतेनुसार, मीठ हे शुद्धीतकरण आणि नकारात्मक शक्ती दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं. जोतिबाला मीठ अर्पण केल्याने वाईट शक्ती दूर होतात, घरातील अडचणी दूर होतात, नकारात्मकता नष्ट होते. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर हा नवस फेडतात. तर पीठ हे अन्न, समृद्धी आणि अन्नपूर्णतेचं प्रतीक मानलं जातं.
जोतिबाला पीठ अर्पण करण्यामागे अशी श्रद्धा आहे की घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही, सुख समृद्धी वाढते, कुटुंबाला भरभराट मिळते. काही लोक मीठ आणि पीठ एकत्र अर्पण करून जीवनातील अडथळे दूर व्हावीत अशी प्रार्थना करतात. जोतिबा येथील मीठ पीठ वाहण्याची ही परंपरा श्रद्धा, समृद्धी आणि संकटमुक्त जीवनाच्या भावनेशी मानली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: जोतिबा आणि यमाई देवी यांच्या परंपरेशी जोडलेल्या श्रद्धेनुसार सुख, समृद्धी आणि अन्नपूर्णतेसाठी मीठ-पीठ अर्पण केले जाते.
Ans: ही परंपरा यमाई देवी अर्थात अन्नपूर्णा देवी यांच्या कृपेशी जोडली जाते.
Ans: होय, यात्रेदरम्यान हजारो भाविक ही परंपरा श्रद्धेने पाळतात.