
फोटो सौजन्य- pinterest
मार्च महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप शुभ असणार आहे. कारण या महिन्यामध्ये नवपंचम राजयोग महिन्याच्या सुरुवातीलाच तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 5 मार्च रोजी रात्री 10.41 वाजता ज्ञानाचा कारक गुरु आणि ग्रहांचा राजा सूर्य एकमेकांपासून १२० अंशांवर असतील. या परिस्थितीमुळे नवपंचम राजयोग तयार होईल, जो खूप शुभ आणि प्रभावी मानला जातो. असे मानले जाते की, या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना बुद्धी, नशीब, पद आणि प्रतिष्ठा आणि आर्थिक प्रगती मिळू शकते. त्यासोबतच या या काळात सामाजिक आदर, करिअरमध्ये प्रगती आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतील. नवपंचम राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग खूप शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ लाभणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीत चांगले परिणाम मिळू शकतात. कामांच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना चांगले निकाल दिसतील. या काळात नवीन नोकरी किंवा पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यासोबतच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहणार आहे. तुमच्या नेतृत्व क्षमता उदयास येतील आणि समाजात तुमचा आदर वाढेल. नवीन प्रभावशाली लोकांशी भेट होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या आयुष्यात अनेक बदल जाणवतील. तुमच्या करिअर आणि व्यवसायाला नवीन दिशा मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. जर तुम्ही कोणत्याही जमिनीत किंवा व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर आता तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल.
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणूक, व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम शक्य आहेत. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल आणि मानसिक शांती राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे आहेत. नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नवपंचम राजयोग हा दोन ग्रहांमधील नवम (९वा) आणि पंचम (५वा) स्थानाचा परस्पर संबंध असताना तयार होणारा शुभ योग आहे. हा योग भाग्य, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि प्रगती यांचे संकेत देतो.
Ans: या योगामुळे नोकरीत पदोन्नती, नवीन संधी, वरिष्ठांचा पाठिंबा आणि कामात यश मिळण्याची शक्यता वाढते. मेहनतीला योग्य फळ मिळते.
Ans: नवपंचम राजयोगाचा मिथुन, सिंह आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे