
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात अधिक मास हा एक अत्यंत पवित्र आणि विशेष महिना मानला जातो. याच पवित्र काळात येणारी पद्मिनी एकादशी हा एक अत्यंत फलदायी उपवास मानला जातो. ही एकादशी केवळ अधिक मासातच येत असल्यामुळे, ती दर तीनवर्षांतून एकदाच येते. या दिवशी भगवान विष्णूची उपासना आणि उपवास केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात आणि अडथळे दूर होतात. अधिक महिन्यातील पद्मिनी एकादशी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
खगोलशास्त्र आणि हिंदू पंचांगानुसार, चांद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यांच्यामध्ये दरवर्षी अंदाजे ११ दिवसांचा फरक असतो. हा फरक भरून काढण्यासाठी, दर ३ वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास, मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते. यामुळेच या महिन्यात येणाऱ्या एकादशी दुर्मिळ मानल्या जातात.
अधिक महिन्यात दोन विशेष एकादशी येत आहे. पद्मिनी एकादशी जी बुधवार, 27 मे रोजी आहे. या एकादशी कमला एकादशी असे देखील म्हटले जाते. तर दुसरी परमा एकादशी, ही एकादशी गुरुवार, 11 जून रोजी असणार आहे. या दोन्ही एकादशीचा उपवास करणे फायदेशीर मानले जाते. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रभावी मानले जातात.
बुधवार, २७ मे रोजी पद्मिनी एकादशीचा उपवास पाळला जाणार आहे. एकादशी तिथीची सुरुवात २६ मे रोजी सकाळी ५:१० वाजता होणार आहे आणि २७ मे रोजी सकाळी ६:२१ वाजता संपणार आहे.
एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करावे.
या दिवशी साबणाने स्नान करणे निषिद्ध मानले जाते, त्यामुळे साबण किंवा कोणतेही रासायनिक क्लीनर वापरणे टाळा.
त्यानंतर देवघर स्वच्छ करून एका चौरंगावर विष्णू, बाळ गोपाल, शालिग्राम आणि श्री यंत्र यांची स्थापना करावी.
नंतर सर्वांना पंचामृताने स्नान घालून त्यांना पिवळे कपडे, फुले आणि तुळशीचा हार घाला.
शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि उदबत्त्या लावा. देवतेला मिठाई, फळे, तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करा.
नंतर विष्णु सहस्रनामाचा पाठ करा आणि “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करा.
या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा आणि शक्य असल्यास त्याच्या सात प्रदक्षिणा घाला.
एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. गरज वाटल्यास, एक दिवस आधी तोडून पाण्यात साठवून ठेवावीत.
पद्मिनी एकादशीचे महत्त्व स्कंद पुराणात सांगितले गेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांनाही हे व्रत पाळण्याची योग्य पद्धत समजावून सांगितली आहे. असे मानले जाते की पद्मिनी एकादशीचे व्रत पाळल्याने व्यक्ती भूतकाळातील आणि वर्तमानातील सर्व पापांपासून मुक्त होऊ शकते. जर एखादी व्यक्ती विधीनुसार आदिमास एकादशी म्हणजेच पद्मिनी एकादशीचे व्रत पाळते, तर तिला भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ धामात स्थान मिळण्याचा लाभ होतो.ट
या दिवशी, आपल्या ऐपतीनुसार गरजू लोकांना तांदूळ, डाळ, पीठ, तूप, मीठ आणि फळे दान करण्याच्या महत्त्वावर भर दिला जातो. असे मानले जाते की पद्मिनी एकादशीला केलेल्या दानाचे अनेक पटींनी फळ मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ही एकादशी अधिकमास किंवा पुरुषोत्तम मासात येत असल्यामुळे अत्यंत पुण्यदायी आणि दुर्मिळ मानली जाते. हा योग साधारणपणे तीन वर्षांतून एकदाच येतो
Ans: पद्मिनी एकादशी बुधवार, 27 मे रोजी आहे
Ans: धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे सुख-समृद्धी, कीर्ती, वैभव आणि आध्यात्मिक प्रगती मिळते.