फोटो सौजन्य- pinterest
17 मे ते 15 जून 2026 दरम्यान अधिकमासाचा कालावधी असणार आहे. यालाच पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. वर्षात साधारणपणे 12 महिन्यांत 24 एकादशी येतात; मात्र प्रत्येक तीन वर्षांनी 13 वा महिना आल्यामुळे आणखी दोन एकादशी वाढून एकूण 26 एकादशी होतात. यंदा ज्येष्ठ महिन्यात अधिकमास आल्याने हा महिना 30 दिवसांऐवजी 60 दिवसांचा राहणार आहे. त्यामुळे या काळात अधिकमासातील दोन अत्यंत महत्त्वाच्या एकादशी येणार असून त्या अत्यंत पुण्यदायी मानल्या जातात.
दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात दोन एकादश्या असतात—
अपरा (अचला) एकादशी – ज्येष्ठ कृष्ण पक्ष
निर्जला एकादशी – ज्येष्ठ शुक्ल पक्ष
मात्र यंदा चार एकादश्या येणार आहेत..
13 मे – कृष्णपक्ष अपरा एकादशी
27 मे – शुक्लपक्ष कमला (पद्मिनी) एकादशी
11 जून – कृष्णपक्ष परमा एकादशी
25 जून – शुक्लपक्ष निर्जला (भीमसेनी) एकादशी
या चारही एकादशी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात.
बुधवार 27 मे पुरुषोत्तमी पद्मिनी (कमला) एकादशी
गुरुवार 11 जून पुरुषोत्तमी परमा एकादशी
अधिकमास किंवा पुरुषोत्तम मासाचे अधिपती स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशी सामान्य एकादश्यांपेक्षा अनंतपटीने अधिक फलदायी मानल्या जातात. हा योग फक्त तीन वर्षांतून एकदाच येत असल्याने आध्यात्मिक उन्नतीसाठी याचे विशेष महत्त्व आहे.
अधिकमासातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हटले जाते. या दिवशी व्रत केल्याने किर्ती, वैभव आणि संततीसुख प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. हे व्रत भक्ताला वैकुंठप्राप्तीचे अधिकारी बनवते आणि जीवनातील भौतिक दुःखे दूर करते.
अधिकमासातील कृष्ण पक्षातील या एकादशीला परमा एकादशी म्हटले जाते. नावाप्रमाणेच ही ‘परम’ सिद्धी आणि ऐश्वर्य देणारी मानली जाते. धार्मिक मान्यतानुसार हे व्रत विधीपूर्वक केल्यास दारिद्र्य, आर्थिक अडचणी आणि अज्ञात पापांपासून मुक्ती मिळते.
शास्त्रांमध्ये वर्णन आहे की, पुरुषोत्तम मासातील या दोन्ही एकादश्यांचे व्रत करून भगवान विष्णूच्या ‘पुरुषोत्तम’ स्वरूपाची पूजा केल्यास शेकडो अश्वमेध आणि वाजपेय यज्ञांइतके पुण्य लाभते.
या तिथींना व्रतासोबत दीपदान, अन्नदान आणि “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या महामंत्राचा जप केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि साधकाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.
पहाटे लवकर उठून स्नान करावे.
स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करावे.
भगवान विष्णूंसमोर दीप प्रज्वलित करून व्रताचा संकल्प करावा.
दिवसभर फलाहार करावा.
द्वादशी तिथीच्या शुभ मुहूर्तावर पारण करून व्रत सोडावे.
या पवित्र आणि दुर्मिळ संधीचा लाभ घ्या आणि श्रीहरींची कृपा प्राप्त करा.
अधिक मासातील एकदशी असल्याने या एकदशींचे व्रत केले पाहिजे. कारण हा दुर्मिळ योग दर तीन वर्षांनी येतो. त्यामुळे यावर्षी हे व्रत नाही करता आले तर पुन्हा तीन वर्षे वाट पाहावी लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: अधिकमास किंवा पुरुषोत्तम मास भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशी अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी मानल्या जातात.
Ans: पुरुषोत्तमी पद्मिनी (कमला) एकादशी आणि पुरुषोत्तमी परमा एकादशी या दोन विशेष एकादश्या येणार आहेत.
Ans: धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते, पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी वाढते.






