Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha 2025: पितृपक्षात आपण कावळ्यांना का खायला घालतो? काय आहे पूर्वजांशी याचा संबंध

पितृपक्षात कावळ्यांना अन्न देणे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, कावळ्यांनी खाल्लेले अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते असे मानले जाते. त्यामुळे त्यांचे आत्मे तृप्त होतात, अशी मान्यता आहे. कावळ्यांना का खायला द्यावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 15, 2025 | 10:22 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

सनातन धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबरपासून झाली आहे आणि 21 सप्टेंबर रोजी पितृपक्ष संपणार आहे. आज पितृपक्षाचा नववा दिवस आहे म्हणजे आज नवमी तिथी आणि अविधवा नवमी आहे. पितृपक्ष 16 दिवस चालते. या काळामध्ये पूर्वजांचे स्मरण केले जाते. तसेच त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान, श्राद्ध यांसारखे विधी केले जातात. यावेळी मृत व्यक्तीच्या नावाने ब्राह्मणांना अन्न, पाणी आणि कपडे यांचे दान केले जाते. तसेच अजून एका विधीमुळे हे कार्य अपूर्ण मानले जात नाही. ते म्हणजे कावळ्यांना देखील अन्न अर्पण करणे. श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना अन्न का खायला देतात आणि त्यांचा पूर्वजांशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया.

श्राद्धाच्या वेळी आपण कावळ्यांना अन्न खायला देतो पण त्यामागील नेमके कारण काय आहे माहीत आहे का? धार्मिक शास्त्रांमध्ये प्रत्येक गोष्टीमागे कारण असते, त्याचप्रमाणे धार्मिक ग्रंथांमध्येही कावळ्यांना खायला घालण्याचा उल्लेख आढळतो.

Astro Tips: तुमच्या पायांचा आकारावरुन समजते आध्यात्मिक विचार आणि भविष्यातील वैशिष्ट्य जाणून घ्या

श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना का खायला दिले जाते.

कावळे घरी येणे चांगले मानले जात नाही. दरम्यान, पितृपक्षात लोक कावळ्यांची वाट पाहतात. यामागील श्रद्धा अशी आहे की जर कावळ्याने पितृपक्षात ठेवलेले अन्न खाल्ल्यास पूर्वज संतुष्ट होतात, अशी मान्यता आहे. तसेच कुटुंबातील सदस्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. धार्मिक श्रद्धेनुसार, कावळ्यांनी खाल्ले अन्न पूर्वजांना मिळते, असे म्हटले जाते. त्यामुळे पितृपक्षात कावळ्यांना अन्न देणे शुभ मानले जाते.

कावळ्याला खायला घालण्याचा काय आहे संबंध

इंद्राच्या पुत्राशी कावळ्यांना अन्न देण्याची एक कथा सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार, इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता. या कथेचा संबंध त्रेतायुगाशी आहे. ज्यावेळी भगवान श्री रामांनी अवतार घेतला जयंतने कावळ्याचे रूप धारण करून सीतेच्या पायावर टोचले त्यानंतर भगवान श्री रामांनी गवतापासून बनवलेला बाण मारला आणि जयंतचा डोळा आंधळा केला. ज्यावेळी त्याने आपण केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली त्यावेळी रामाने त्याला वरदान दिले की त्याला अर्पण केलेले अन्न पूर्वजांना दिले जाईल. तेव्हापासून श्राद्धात कावळ्यांना अन्न देण्याची परंपरा चालत आली आहे. म्हणून श्राद्धाच्या वेळी प्रथम अन्न कावळ्यांना अर्पण केले जाते.

Zodiac Sign: भद्रराजयोग आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशीच्या लोकांना होणार लाभ

शकुनशास्त्र कावळ्यांबद्दल काय सांगते?

पितृपक्षामध्ये जर कावळा तुमच्या घरामध्ये वारंवार येऊन आवाज करत असेल तर तो पूर्वजांनी पाठवलेला संकेत मानला जातो.

जर सकाळी लवकर घराच्या बाल्कनी किंवा दाराजवळ कावळ्याचा आरवला ऐकून आला तर ते पाहुणे येण्याचे संकेत असू शकते.

घराच्या उत्तरेकडे कावळा वारंवार आवाज देणे हे लवकरच संपत्ती मिळण्याचे लक्षण मानले जाते.

जर अचानक तुमच्याभोवती खूप कावळे जमू लागले, तर ते भविष्यात तुमच्या जीवनात मोठ्या बदलाचे संकेत देते.

जर तुम्हाला कधी कावळा वाटेतून जाताना त्याच्या चोचीमध्ये भाकरी, मांस किंवा कापडाचा तुकडा धरलेला दिसला, तर तो तुमच्या बहुप्रतिक्षित इच्छेच्या पूर्ततेचे लक्षण मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksha why do we feed crows relationship with ancestors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • dharm
  • Pitru Paksha
  • religions

संबंधित बातम्या

Ramayana: आजही जिवंत आहेत श्रीरामांच्या आठवणी, वनवासातील श्रीरामांचा अद्भुत प्रवास जाणून घेऊया
1

Ramayana: आजही जिवंत आहेत श्रीरामांच्या आठवणी, वनवासातील श्रीरामांचा अद्भुत प्रवास जाणून घेऊया

Pradosh Vrat 2026: मार्च महिन्यामधील तिसरे प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
2

Pradosh Vrat 2026: मार्च महिन्यामधील तिसरे प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Shukra Gochar 2026: शुक्र ग्रह बदलणार चाल, 26 मार्चपासून या राशींच्या लोकांना होणार लाभ
3

Shukra Gochar 2026: शुक्र ग्रह बदलणार चाल, 26 मार्चपासून या राशींच्या लोकांना होणार लाभ

Chaitra Navratri: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी करा स्कंदमातेची पूजा, मिळेल सुख आणि शांती
4

Chaitra Navratri: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी करा स्कंदमातेची पूजा, मिळेल सुख आणि शांती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.