
फोटो सौजन्य- pinterest
महर्षी वसिष्ठ हे इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरु होते. अयोध्येच्या राजघराण्याचे आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून त्यांना अत्यंत मान होता. राजा दशरथ यांच्यासह संपूर्ण राजपरिवार त्यांचा आदर करत असे. श्रीरामांच्या बालपणातील शिक्षणाची जबाबदारी महर्षी वसिष्ठ यांच्याकडे होती.
वेद आणि उपनिषदांचे अध्ययन, धर्मशास्त्र आणि राजधर्म, सत्य, संयम आणि करुणा, समाजव्यवस्था आणि न्यायनीती, गुरुभक्ती व मातापित्यांचा आदर प्रजेप्रती कर्तव्यभावना अशी अंतर्गत जीवन पुष्प सुगंधीत करण्यास शिक्षण दिले. त्यामुळे श्रीराम रामराज्य उभे करू शकले. तसेच श्रीरामांच्या स्वभावातील शांतता, नम्रता, आज्ञाधारकपणा आणि धर्मनिष्ठा ही वसिष्ठांच्या संस्कारांचीच देण होती.
महर्षी वसिष्ठांनी श्रीरामांना शिकवले की राजा हा केवळ सत्ताधारी नसतो, तर तो प्रजेचा पालक असतो. त्यामुळे श्रीराम पुढे “मर्यादा पुरुषोत्तम” म्हणून ओळखले गेले. वनवास स्वीकारताना, पित्याची आज्ञा पाळताना किंवा प्रजेसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करताना श्रीरामांनी वसिष्ठांच्या शिकवणीचे पालन केले.
महर्षी विश्वामित्र हे पूर्वी पराक्रमी राजा होते. नंतर त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मर्षी पद प्राप्त केले. ते महान तपस्वी, विद्वान आणि दिव्य अस्त्रांचे ज्ञाता होते. जेव्हा राक्षस यज्ञांमध्ये विघ्ने आणत होते, तेव्हा विश्वामित्रांनी राजा दशरथांकडे जाऊन श्रीराम आणि लक्ष्मण यांना आपल्या सोबत पाठवण्याची विनंती केली. सुरुवातीला दशरथ घाबरले, परंतु महर्षी वसिष्ठांनी त्यांना समजावले की विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली रामांचे महान कार्य घडेल.
महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामांना धनुर्विद्या, युद्धकला दिव्य अस्त्र-शस्त्रांचे ज्ञान, संकटांशी सामना करण्याचे धैर्य
अधर्माविरुद्ध लढण्याची प्रेरणा हे सर्व शिक्षक दिले. त्यांनी श्रीरामांना अनेक दिव्य अस्त्रे प्रदान केली. यामुळे श्रीराम केवळ राजकुमार न राहता महान योद्धा बनले.
विश्वामित्रांच्या आदेशाने श्रीरामांनी ताडका नावाच्या राक्षसीचा वध केला. त्यानंतर सुबाहूचा नाश केला आणि मारीचाला दूर पळवले. यामुळे ऋषींचे यज्ञ सुरक्षित झाले. यातून श्रीरामांनी शिकले की धर्मरक्षणासाठी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात.
महर्षी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मणांना घेऊन मिथिलेला गेले. तेथे भगवान शिवांचे महान धनुष्य उचलून श्रीरामांनी ते मोडले आणि सीता यांच्याशी विवाह झाला. या घटनेमुळे श्रीरामांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. वसिष्ठांनी श्रीरामांच्या अंतःकरणाला घडवले, तर विश्वामित्रांनी त्यांच्या बाह्य सामर्थ्याला दिशा दिली.
श्रीराम आपल्या गुरूंचा अत्यंत आदर करत. त्यांनी कधीही गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन केले नाही. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्रीरामांचे जीवन होय.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: महर्षी वसिष्ठ हे इक्ष्वाकू वंशाचे राजगुरु आणि अत्यंत महान ऋषी मानले जातात. त्यांनी श्रीराम यांना धर्म, संयम आणि आदर्श जीवनाचे शिक्षण दिले.
Ans: या दोन्ही गुरूंनी श्रीरामांचे व्यक्तिमत्त्व घडवले. वसिष्ठांनी आध्यात्मिक आणि नैतिक मूल्ये दिली, तर विश्वामित्रांनी पराक्रम आणि युद्धनीती शिकवली.
Ans: कारण श्रीराम नेहमी आपल्या गुरूंचा आदर करत आणि त्यांचे आदेश नम्रतेने पाळत असत.