
फोटो सौजन्य- pinterest
भगवान कार्तिकेय हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र तसेच देवसेनेचे सेनापती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हातातील शक्तिशाली भाला (वेल) आणि वाहन म्हणून असलेला मोर हे त्यांच्या स्वरूपाचे वैशिष्ट्य आहे. भगवान कार्तिकेयांचे वाहन मोरच का आहे, काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या
एकदा सुरपद्म नावाच्या बलाढ्य राक्षसाने कठोर तप करून वरदान मिळवलं. त्या वरदानांच्या बळावरती त्याने देवावरती अत्याचार सुरू केले. देवांना पराभूत करून त्याने स्वर्गावरही अधिकार मिळवला. देवाने भगवान शिवाकडे मदत मागितली. त्यानंतर भगवान शिवाच्या तेजातून कार्तिकेयांचा जन्म झाला. त्यांना देवसेनेचा सेनापती बनवण्यात आली आणि त्यांनी सुरपद्मना विरोधात युद्ध पुकारलं. हे युद्ध अनेक दिवस चाललं आणि शेवटी कार्तिकेयांनी आपल्या दिव्य वेल अर्थातच भाल्याने सुरपद्मनाचा पराभव केला. युद्धाचा पराभव निश्चित झालेल पाहून सुरपद्मनाने स्वतःच रुप बदलून एक विशाल वृक्षाचं रुप धारण केलं.
कार्तिकेयाने आपल्या भालाने त्या वृक्षाचे दोन तुकडे केले त्या दोन तुकड्याचं रुपांतर मोर आणि कोंबडात झालं. सुरपद्मनाला आपल्या चुकीची जाणीव झाली. कार्तिकेयाची त्यानी क्षमा मागितली त्याचा पश्चाताप पाहून कार्तिकेयाने त्याला शिक्षा न करता कृपा केली. मोराला वाहन म्हणून स्वीकारलं तर कोंबड्याला आपल्या ध्वजावरती स्थान दिलं.
अशा प्रकारे शत्रूच भक्त बनला आणि भगवान कार्तिकेयांच्या सेवेते राहू लागला. कार्तिकेय यांच्या वाहनातील मोर अनेक गोष्टींचा प्रतीक मानला जातो. अहंकारावरील विजय, मोर हे सौदर्यांचं प्रतीक जरी असलं तरी कार्तिकेय त्यावर आरुढ आहे. म्हणजेच अहंकारावरती नियंत्रण- मोर सर्पावरती हल्ला करतो त्यामुळे ते भीती अज्ञान, नकारात्मक शक्तींवरती विजयाचा प्रतीक मानला जातो.
मोर सतर्क, धाडसी आणि तेजस्वी असल्याने तो योद्ध्याचा देखील गुण दर्शवतो. कार्तिकेय हे ज्ञानाचे देव मानले जातात. त्यांच्या वाहनांचा अर्थ शक्ती आणि बुद्धी यांचा समतोल असा मानला जातो. कार्तिकेय यांच्या ध्वजावरील कोंबडा अंधार दूर करून नव्या प्रकाशाची घोषणा करतो. तो जागृकता, धैर्य आणि सतत सजग राहण्याची प्रेरणा देतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पौराणिक कथेनुसार, सुरपद्म असुराचा पराभव केल्यानंतर भगवान कार्तिकेयांनी त्याच्या पश्चात्तापामुळे त्याचे मोरात रूपांतर करून त्याला आपले वाहन म्हणून स्वीकारले.
Ans: सुरपद्माच्या दुसऱ्या भागाचे कोंबड्यात रूपांतर झाले. भगवान कार्तिकेयांनी त्याला आपल्या ध्वजावर स्थान दिले. कोंबडा जागरूकता, धैर्य आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो.
Ans: मोर हा अहंकारावर विजय, शौर्य, तेज, सौंदर्य, सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक शक्तींवर मात करण्याचे प्रतीक मानला जातो.