फोटो सौजन्य- istock
भगवान कार्तिकेय यांना विविध नावांनी ओळखले जाते. हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र तसेच देवसेनेचे सेनापती मानले जातात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान कार्तिकेय यांना शौर्य, पराक्रम, ज्ञान आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या जन्मामागील कथा अत्यंत रंजक आणि पौराणिक अशी आहे. भगवान कार्तिकेय यांचा जन्म कसा झाला त्याची पौराणिक कथा जाणून घ्या
एकदा तारकासूर नावाच्या बलाढ्य असुराने कठोर तपश्चर्या करून एक वरदान मिळवलं की त्याचा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच होईल त्यावेळी भगवान शिव तपश्चर्येत मग्न होते आणि त्यांना पुत्र नव्हता. त्यामुळे तारकासुराने देव, ऋषी आणि सामान्य लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. देवताने शिव आणि पार्वती यांची आराधना केली. त्यांच्या विवाहानंतर दिव्य तेजातून अद्भुत ऊर्जा प्रकट झाली हे तेज इतक प्रखर होत की कोणालाही धारण करता येत नव्हतं. सुरुवातीला हे तेज अग्नी देवाने स्वीकारलं. परंतु त्यांनाही त्याच्या उष्णतेचा भार सहन झाला नाही. मग ते तेज गंगा नदीच्या स्वाधीन करण्यात आलं. गंगेने ते आपल्या प्रवाहातून सरवन नावाच्या नरखंडाच्या वनात पोहोचवलं.
तेथे त्या तेजातून दिव्य बालक प्रकट झालं त्या बालकांच संगोपन आकाशातील सहा कृतिका मातांनी केलं. प्रत्येक मातेला त्या बालकावरती प्रेम असल्याने त्याने सहा मुग धारण केले जेणेकरून तो सर्व मातांचे दूध एकाचवेळी पिऊ शकेल, म्हणूनच कार्तिकेयांना षण्मुख म्हणजेच सहा मुख असलेलं किंवा षडानन असेही म्हणतात. नंतर भगवान शिव आणि पार्वती यांनी त्या बालकाला आपला पुत्र म्हणून स्वीकारला. पुढे तोच कार्तिकेय देवसेनेचा सेनापती बनला. त्याने तारकासुरांचा वध करून देवसेतांना संकटांपासून मुक्त केलं.
भगवान कार्तिकेयांची पूजा विशेषतः धैर्य, पराक्रम, बुद्धिमत्ता, संततीसुख आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी केली जाते. दक्षिण भारतात त्यांची मुरुगन या नावाने मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते, तर महाराष्ट्र आणि उत्तर भारतातही स्कंद षष्ठी, कार्तिक महिन्यातील उत्सव आणि इतर धार्मिक प्रसंगी त्यांचे स्मरण केले जाते.
भगवान कार्तिकेय लहान वयातच अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी झाले. देवतांनी त्यांची देवसेनेचे सेनापती म्हणून नियुक्ती केली. त्यांनी तारकासुराशी भीषण युद्ध करून त्याचा वध केला आणि देवतांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. त्यामुळे भगवान कार्तिकेय यांना विजय, शौर्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भगवान कार्तिकेय हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र तसेच देवसेनेचे सेनापती मानले जातात. त्यांना स्कंद, षण्मुख, षडानन आणि मुरुगन या नावांनीही ओळखले जाते.
Ans: पौराणिक कथेनुसार भगवान शिवांच्या दिव्य तेजातून भगवान कार्तिकेयांचा जन्म झाला. हे तेज अग्निदेव आणि गंगामार्गे सरवन येथे पोहोचले, जिथे दिव्य बालक प्रकट झाले.
Ans: भगवान कार्तिकेयांचे पालनपोषण सहा कृतिका मातांनी केले. प्रत्येक मातेला दूध पाजता यावे म्हणून त्यांनी सहा मुख धारण केले. त्यामुळे त्यांना षण्मुख किंवा षडानन असे म्हणतात.






