
फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्रातील लोकदेवता खंडोबा यांची उपासना ही श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः जेजुरी येथे खंडोबाच्या भक्तांची अपार गर्दी पाहायला मिळते. या पूजेमध्ये “गोंधळ घालणे” ही एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि पौराणिक परंपरा आहे. खंडोबाला गोंधळ घालण्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत.
खंडोबाच्या भक्तीत गोंधळ घालण्याची परंपरा अतिशय जुनी आणि भावपूर्ण आहे. खंडोबा हा भक्तांच्या नवसाला पावणारा देव मानला जातो आणि गोंधळ हा त्याच्या पूजेतील एक महत्त्वाचा विधी. हा गोंधळ का घातला जातो असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? गोंधळ घालण्यामागील कारण काय आहे ते जाणून घेऊया
नवस पूर्ण झाल्यावरती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा जेव्हा एखाद्या भक्ताची मनोकामना पूर्ण होते म्हणजेच लग्न, मुल, आरोग्य, व्यवसाय तेव्हा खंडोबाला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी हा गोंधळ घातला जातो. हा देवाला धन्यवाद देण्याचा एक मार्ग आहे. गोंधळामध्ये भजन, गाणी, कथा आणि नृत्य यांचा समावेश असतो त्यामुळे देव प्रसन्न होतो आणि घरात सुख समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.
गोंधळामध्ये खंडोबाच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या जातात. जसे की, मणी आणि मल्ल राक्षसांचा वध त्यामुळे भक्तांना देवाची महती कळते आणि श्रद्धा वाढते. याशिवाय गोंधळ घालताना ढोल ताशे आणि मंत्र यांच्या आवाजामुळे वाईट शक्ती होरपळतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. गोंधळ घालणाऱ्यांना गोंधळी असं म्हणतात. हे विशेष कलाकार असून ते पारंपरिक वेशात गोंधळ घालतात. यात देवदेवतांची गाणी आणि कथा सादर केली जाते. तुणतुण, ढोल, झांज यांसारखी वाद्य गोंधळ घालताना वापरली जातात. खंडोबाला गोंधळ घालणे हा फक्त विधी नसून भक्ती, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर लोकपरंपरागत मार्ग आहे.
गोंधळाचे धार्मिक महत्त्व
गोंधळ हा केवळ एक विधी नसून तो भक्त आणि देव यांच्यातील नाते अधिक दृढ करणारा एक माध्यम आहे. या माध्यमातून भक्तांना मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि श्रद्धेची अनुभूती मिळते. गोंधळ करताना मंत्र, वाद्यांचा नाद आणि भक्तीभाव यामुळे वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनते. अनेकांच्या श्रद्धेनुसार या विधीमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. तसेच भक्त आणि देव यांच्यातील नाते अधिक दृढ होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नवस पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी गोंधळ घातला जातो.
Ans: गोंधळामुळे देव प्रसन्न होतो, घरात सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशी श्रद्धा आहे.
Ans: भक्तीभावाने देवाची स्तुती करणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि आनंद साजरा करणे हा गोंधळाचा मुख्य उद्देश आहे.