
फोटो सौजन्य-pinterest
पैठणचा राजा शालिवाहन याने मातीचे पुतळे बनवून त्यांना जिवंत केले. सातवाहन कुळातील राजाने (काही कथांनुसार कुंभाराचा मुलगा) शकांचा पराभव करण्यासाठी मातीचे हत्ती, घोडे आणि सैनिक तयार केले, ज्यामध्ये प्राण फुंकून त्याने युद्ध जिंकले आणि शालिवाहन शक सुरू केला. त्यांच्या सहाय्याने शत्रूंना (शक) पराभूत केले. या विजयाचे प्रतीक म्हणून इ.स. ७८ मध्ये शालिवाहन शक कालगणना सुरू झाली, जी आजही महाराष्ट्र व दक्षिण भारतात पाळली जाते. या कथेचा संबंध गुढीपाडव्याशी (नवीन वर्ष) जोडला जातो, जो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.
काही मतानुसार, ही कथा एका सामान्य कुंभाराच्या मुलाने मातीची खेळणी बनवण्याशी संबंधित आहे, जो पुढे एक महान राजा बनला.
शालिवाहन या शब्दाचा अर्थ शालि–साळी–चे भात भरलेली गाडी, तिला पाणिनीय काली शालिवाहण म्हणत. शालिवाहण हे ज्यांचे विशिष्ट देवक ते घराणे शालिवाहण (न) आडनाव धारण करी. शालिवाहन हे देवक असण्याचे कारण कलिंग व आंध्र प्रदेश यांत पूर्वी व आजही भात हेच मुख्य पीक आहे. शालिवाहणचे मूळ प्राकृत रूप ‘सालाहण’ असे आढळते. त्याचे पुढे संस्कृतीकरण होऊन ‘शालिवाहन’ असे राजनाम बनले.
शालिवाहनासंबंधी काही प्रचलित आख्यायिका आहेत. त्यापैकी एका ब्राह्मणाचे दोन मुलगे व मुलगी असे तिघे जण आईवडिलांच्या मृत्यूनंतर पैठण नगरात गेले आणि तेथे एका कुंभाराच्या घरी राहू लागले. एकदा ती मुलगी गोदावरी नदीवर स्नानास गेली असता, तिच्यावर शेषाची (नागाची) नजर गेली. त्याने तिला मोहून टाकले. त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. या घटनेवेळेस कर्दम, शहरात(खरात) या शक वंशीय लोकांचे पैठण भागात राज्य होते. त्यामुळे खरात ,शिंदे, सुळ इत्यादी नागवंशी धनगर त्या भागात मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले होते. कुंभाराच्या घरी वाढल्यामुळे तो मातीची खेळणी करण्यात तरबेज झाला. मातीच्या भातगाड्या तयार करून तो आपल्या सवंगड्यांना देत असे. त्यावरून या मुलाचे नाव शालिवाहन पडले. या वेळी उज्जयिनीला विक्रमादित्य राजा राज्य करीत होता. त्याला वेताळाकडून समजले की, आपला नाश करणारा एक मुलगा पैठणला वाढत आहे. त्याने पैठणवर स्वारी करून सोमकांत राजाचा पराभव केला व त्यास कैद केले. शालिवाहनाला ही गोष्ट कळली, तेव्हा तो मातीचे घोडे, हत्ती, शिपाई यांच्याशी खेळत होता. त्याला एक कल्पना सुचली आणि त्याने शेषराजाचे स्मरण केले व मातीच्या खेळण्यांत प्राण फुंकले. तेव्हा त्यांतून असंख्य सैन्य व घोडेस्वार बाहेर पडले. त्यांच्या मदतीने शालिवाहनाने विक्रमादित्याचा पराभव केला आणि सोमकांताची कैदेतून मुक्तता केली. पुढे पैठणच्या जनतेने शालिवाहनाला आपला राजा म्हणून निवडले.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शालिवाहन हा पैठणचा प्रसिद्ध राजा मानला जातो. तो सातवाहन वंशाशी संबंधित असल्याचे मानले जाते आणि त्याच्याशी अनेक पौराणिक व ऐतिहासिक कथा जोडलेल्या आहेत.
Ans: काही आख्यायिकांनुसार तो एका कुंभाराच्या घरी वाढला. लहानपणी तो मातीची खेळणी बनवण्यात कुशल होता, ज्यातून पुढे त्याच्या अद्भुत कथेची सुरुवात झाली.
Ans: कथेनुसार, राजा शालिवाहन याने मातीचे घोडे, हत्ती आणि सैनिक तयार केले आणि त्यात प्राण फुंकले, ज्यामुळे ते जिवंत झाले आणि युद्धासाठी सज्ज झाले.