Anna Hazare's Lokpal protest came to success history of April 09 dinvishesh
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये उपोषण आणि आंदोलनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यानंतर आजही अनेक मागण्यांसाठी सरकारसमोर आंदोलन करण्याची पद्धत भारतीय लोकशाहीमध्ये वापरली जाते. असेच एक दशकापूर्वी उपोषणातून एक नाव देशभर गाजले ते म्हणजे अण्णा हजारे. त्यांनी लोकपालच्या मुद्द्यावरून 2011 मध्ये देशव्यापी आंदोलन केलं. दिल्लीतील त्यांच्या या आंदोलनाने देशभरामध्ये पुन्हा एकदा उपोषणाची ताकद दिसून आली होती. जनमानसांमध्ये अण्णा हजारे यांचे नाव गाजू लागले होते. प्रख्यात भारतीय समाजसेवक अण्णा हजारे दिल्ली येथे लोकपाल बील कायदा पास करण्यासठी करीत असलेले आमरण उपोषण सरकारने आपली मागणी मान्य केल्यानंतर बंद केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा