Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?

आळंदीवरुन ज्ञानेश्वर महराजांची निघणारी पालखी आणि देहूवरुन संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणं आहेत. वारीची परंपरा फार जुनी आहे मात्र ही प्रथा रुढ कशी झाली हे तुम्हाला माहितेय का ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 19, 2025 | 01:05 PM
Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?
Follow Us
Close
Follow Us:

“पाऊले चालची पंढरीची वाट” या गाण्याच्या ओळी शाश्वत वाटतात. वर्षभर विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली अनेक वारकरी आषाढीची वारी करत पायी पंढरपूरी जातात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्तीपरंपरा आहे. आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं म्हणजे सुख अनुभवणं आहे. बुधवारीच आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे. आळंदीवरुन ज्ञानेश्वर महराजांची निघणारी पालखी आणि देहूवरुन संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणं आहेत. वारीची परंपरा फार जुनी आहे मात्र ही प्रथा रुढ कशी झाली हे तुम्हाला माहितेय का ?

असा आहे वारीचा इतिहास

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने वारीची सुरुवात होते. श्री क्षेत्र आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशीचा आदल्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचते. या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात. या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळीं आपापल्या दिंडीतून पायी चालत जातात.

ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून अनेकदा अपमान सहन करावा लागला. ज्ञानदेवांच्या वडीलांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमाकडे वळले. त्यानंतर धर्मपिठाने त्यांना कठोर शासन दिलं. संन्यासाशी पोरं म्हणून ज्ञानेश्वर , निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई यांना कायमच समाजातील अनिष्ठ रुंढीं प्रथांमुळे डावललं गेलं होतं.

ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करीत असत असे संदर्भ मिळतात. विठ्ठलपंत कुलकर्णी हे न चुकता आषाढी वारी करत असे. यातून त्यांच्या विठ्ठलभक्तीची प्रचिती येते. वडीलांची हीच प्रथा ज्ञानेश्वर महाजांनी सुरु ठेवली. वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्यानंतर ज्ञानेश्वर आणि भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली. ज्ञानेश्वर महाजांच्या समाधीनंतर ही वारीची प्रथा निरंतर सुरु ठेवली ती तुकाराम महाराजांनी.

आषाढी वारीसाठी निघताना तुकोबा देहूवरुन आधी आळंदीला ज्ञानदेव महाजांच्या समाधीजवळ जायचे. संत ज्ञानेश्वर माऊलीं’च्या पादुका घेऊन ते पंढरपूरला जात असत. तुकोबांच्या नंतर ही परंपरा त्यांचे सुपुत्र ‘नारायण महाराज’ यांनी सुरू ठेवली.नारायण महाराज देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे आणि आळंदीला जायचे तिथून ते ‘संत ज्ञानेश्वर माऊली’ यांच्या पादुका घ्यायचे आणि मग पंढरपूरला जायचे. त्यानंतर काही वर्षांनी श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत बसवून दिंडी पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.

नारायण महाराज देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे आणि आळंदीला जायचे तिथून ते ‘संत ज्ञानेश्वर माऊली’ यांच्या पादुका घ्यायचे आणि मग पंढरपूरला जायचे. त्यानंतर काही वर्षांनी ‘श्री गुरु हैबत बाबा’ यांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांचा स्वतंत्र असा पालखी सोहळा सुरू केला.असं म्हणतात की, गुरु हैबतबाबा यांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांचा स्वतंत्र असा पालखी सोहळा सुरू केला. ‘श्री गुरुहैबत बाबा’ हे शिंदे सरकार यांच्या संस्थानात होते. ‘श्री गुरुहैबत बाबा’ हे शिंदे सरकार यांच्या संस्थानात होते. गुरुहैबत बाबा’ हे राज दरबारी एक सैनिक होते. त्यामुळे पालखीला एक शिस्तबद्ध आखणी नेंमण्यात आली होती. गुरुहैबत बाबा यांनी केलेल्या दिंडीच्या नियोजनाप्रमाणे आजही देहू आळंदीहून निघणारी पालखी ही शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपुरी जाते.

 

 

 

 

 

Web Title: Ashadhi wari history of dnyaneshwar maharaj and tukaram maharaj in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Dnyaneshwar Maharaj Palkhi
  • Saint Tukaram Maharaj Palkhi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.