Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Martyr’s Day : शाहिद होण्यापूर्वी कोणते पुस्तक वाचत होते भगतसिंग आणि त्यांनी का घेतले फासाचे चुंबन?

Martyr's Day : शहीद-ए-आझम भगतसिंग आणि त्यांचे दोन साथीदार राजगुरू आणि सुखदेव यांना 1931 मध्ये आजच्या दिवशी फाशी देण्यात आली, परंतु त्यांनी ब्रिटीश राजवटीपुढे शरणागती पत्करली नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 23, 2025 | 08:58 AM
Martyr's Day Bhagat Singh's last book and his gallows kiss revealed

Martyr's Day Bhagat Singh's last book and his gallows kiss revealed

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : 23 मार्च हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी १९३१ मध्ये शहीद-ए-आझम भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. स्वातंत्र्याच्या यज्ञात त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला आज संपूर्ण देश नतमस्तक होऊन वंदन करत आहे. भगतसिंग हे केवळ एक क्रांतिकारक नव्हते, तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवा दिशा दिली. आपल्या साथीदारांसह त्यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात लढा उभारला, मात्र इंग्रज सरकारने त्यांना कट्टर शत्रू मानून निर्दयीपणे फाशी दिली. तथापि, त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता.

फाशीच्या वेळेचे हृदयस्पर्शी चित्र

सामान्यतः तुरुंगातील कैद्यांना सकाळी फाशी दिली जात असे, पण भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना सायंकाळी ७.३० वाजता लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली. तुरुंगातील प्रत्येक कैद्याला या घटनेची कल्पना होती आणि संपूर्ण वातावरण शोकमय झाले होते. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना जेव्हा फाशीच्या चौकाकडे नेले जात होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि अभिमानाचे तेज होते. तिघेही मनमोकळ्या हास्यासह पुढे जात होते. त्या क्षणी ते “दिल से निकलगी ना मरकर भी वतन की उल्फ़त…” हे गीत गात होते. या गाण्यात त्यांच्या देशप्रेमाची भावना आणि बलिदानाची तयारी स्पष्ट दिसत होती.

फाशीपूर्वीचे शेवटचे पुस्तक

भगतसिंग यांना वाचनाची प्रचंड आवड होती. फाशीच्या आधीच्या क्षणांमध्येही ते पुस्तक वाचत होते. जेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना शेवटची इच्छा विचारली, तेव्हा त्यांनी “माझे पुस्तक पूर्ण करण्यासाठी मला थोडा वेळ द्या” अशी मागणी केली. हे पुस्तक रशियन क्रांतिकारक लेनिनचे चरित्र होते. हे वाचून त्यांचा क्रांतिकारी विचारसरणीवरचा ठाम विश्वास आणि संघर्षाची जिद्द स्पष्ट होते. मृत्यूला सामोरे जाण्यापूर्वी देखील ते ज्ञान ग्रहण करत होते आणि क्रांतीच्या विचारांना आपल्या मनात घट्ट रुजवत होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनविरुद्धच्या युद्धासाठी अमेरिकेचा मेगा प्लॅन; गुप्त दस्तऐवजांनी उलगडले रहस्य

फासाचे चुंबन आणि अमरत्वाच्या दिशेने प्रवास

फाशी देण्याचा अंतिम क्षण आला, तेव्हा भगतसिंगांनी फासाच्या दोरीचा चुंबन घेतला आणि आनंदाने मृत्यूला सामोरे गेले. हे दृश्य केवळ हृदयद्रावक नव्हते, तर क्रांतिकारकांचा सर्वोच्च आदर्श दाखवणारे होते. त्यांनी कधीही ब्रिटिश सरकारसमोर नमतुकडीची भूमिका घेतली नाही. ते शेवटपर्यंत हसतमुखाने मृत्यूला कवटाळणारे शूर योद्धा होते. त्यांचा बलिदान भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवा स्फूर्तीप्रेरक संदेश देणारा ठरला.

अंत्यसंस्कारातील अमानवीयता आणि जनता भडकण्याची भीती

ब्रिटिश प्रशासनाने तिघांच्या शवांची विल्हेवाट तुरुंगातच लावण्याचा निर्णय घेतला होता, परंतु लोकांनी बंड करण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना सतलज नदीच्या काठावर गुपचूप नेण्यात आले. इतकेच नव्हे, तर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी पहाटेच अर्धवट जळती चिता विझवली आणि मृतदेह नदीत फेकून दिले. मात्र, स्थानिक गावकऱ्यांनी शव पुन्हा बाहेर काढले आणि योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

भगतसिंगांचे विचार – तरुणांसाठी प्रेरणादायी वारसा

भगतसिंग यांनी केवळ ब्रिटिशांविरुद्ध शस्त्रे उचलली नाहीत, तर त्यांच्या विचारांनीही संपूर्ण देश जागृत केला. ते म्हणायचे, “जर एखाद्या ध्येयासाठी तुम्ही जगू शकत नसाल, तर त्या ध्येयासाठी तुम्ही मरायलाही तयार होऊ नका.” त्यांच्या बलिदानाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेग आला आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात क्रांतीचा जाज्वल्य प्रकाश पेटला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशात पुन्हा बंड होणार? मोहम्मद युनूसची एक चूक आणि सरकार होणार नेस्तनाबूत

 बलिदानाची अमर कहाणी

२३ मार्च हा दिवस भारतासाठी आदर, अभिमान आणि दुःखाच्या संमिश्र भावनांनी भारलेला असतो. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शौर्यकथेला शतकानुशतके विसरता येणार नाही. आजही त्यांचे विचार भारतीय तरुणांना संघर्षाची प्रेरणा देतात. ते केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर क्रांतीचा एक तेजस्वी सूर्य होते, जो आजही आपल्या विचारांमधून अंधकार दूर करत आहे. “इन्कलाब जिंदाबाद!”

Web Title: Martyrs day bhagat singhs last book and his gallows kiss revealed nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • india
  • India news
  • Soldier Martyr

संबंधित बातम्या

Strait of Hormuz: होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली! भारतासह 35 देशांची तातडीची बैठक; तर ब्रिटनकडून इराणवर कडक टीका
1

Strait of Hormuz: होर्मुजचा तिढा सोडवण्यासाठी जागतिक हालचाली! भारतासह 35 देशांची तातडीची बैठक; तर ब्रिटनकडून इराणवर कडक टीका

Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद
2

Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद

Oil Economy : तेलसंपन्न व्हेनेझुएलामधील चीनची पकड सुटली; भारताचा मात्र  विजय, आता ट्रम्प यांनी दिली मोठी आनंदाची बातमी
3

Oil Economy : तेलसंपन्न व्हेनेझुएलामधील चीनची पकड सुटली; भारताचा मात्र विजय, आता ट्रम्प यांनी दिली मोठी आनंदाची बातमी

खळबळजनक! इंडिगोच्या विमानातील शौचालयात ‘Danger’ लिहिलेला टिश्यू पेपर सापडला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
4

खळबळजनक! इंडिगोच्या विमानातील शौचालयात ‘Danger’ लिहिलेला टिश्यू पेपर सापडला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.